HW News Marathi
महाराष्ट्र

‘शाश्वत विकासासाठी स्वतःवर बंधने घाला’ | डॉ. हेमा साने

पुणे | ‘​ श्वाश्वत विकासासाठी इंधन ,खते ,कीटकनाशके ,वीज , प्लास्टिक,पाणी अशा अनेक गोष्टींच्या वापराच्या बाबतीत सरकारला सांगण्यापेक्षा आपण स्वतःवर बंधने घालून घेतली पाहिजेत, पुढील पिढयांना नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारसा शिल्लक ठेवला पाहिजे ​’ असे प्रतिपादन डॉ. हेमा साने यांनी बोलताना केले. निमित्त होते ‘जीविधा ‘संस्थेतर्फे पुण्यात​ आयोजित ​ हिरवाई महोत्सवाच्या सांगता समारंभाचे. हा महोत्सव २१ जून ते २३ जून दरम्यान ‘इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र’ येथे पार पडला. सांगता प्रसंगी त्या ‘शाश्वत विकास’ या विषयावर प्रा.साने यांचे व्याख्यान झाले. यंदाचे या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे. ​ ​यावेळी डॉ हेमा साने यांच्या ‘शाश्वत विकास ‘ या पुस्तकाचे प्रकाशन ‘निसर्ग सेवक ‘संस्थेचे अध्यक्ष डॉ रमेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले ‘जीविधा’ संस्थेचे संचालक राजीव पंडित, ​डॉ रमेश गोडबोले ,डॉ द महाजन ,डॉ विनया घाटे ​,’महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी’ चे सुनील भिडे,मंदार दातार आदी उपस्थित होते.

डॉ. हेमा साने म्हणाल्या,​ ‘विकासाला आमच्यासारख्या पर्यावरण अभ्यासकांचा विरोध नाही. मात्र, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस ,उधळपट्टी करण्याला विरोध आहे . मर्यादित साधनसंपत्तीचा अमर्याद वापर करून अमर्याद विकास होणे शक्य नाही . जीडीपी वाढवणे म्हणजे गरजा वाढवणे ,वस्तूंच्या अमर्याद वापराला प्रोत्साहन देणे,कचरा वाढवणे ,प्रदूषण वाढवणे नव्हे. ​त्या पुढे म्हणाल्या ,​ ‘​पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्वनीकरणीय असे ऊर्जेचे जे दोन प्रकार आहेत ,त्यातील अपुनर्नवीकरणीय म्हणजे पुन्हा निर्माण करता येऊ न शकणाऱ्या ऊर्जेच्या वापरावर आपण स्वतःच बंधने घालून घेतली पाहिजेत ,नैसर्गिक साधन संपत्ती आपण ओरबाडून संपवत आहोत .

भविष्यात तेलाचे साठे संपणार आहेत ​. म्हणून ,पुढच्या पिढीला आपण नैसर्गिक साधनसंपत्ती संभाळून ठेवली पाहिजे . अनेक वस्तूंचा दैनंदिन जीवनात वापर करताना ‘रिफ्युज ,रियूज ,रिड्यूस ,रिसायकल ,रिस्टोरेशन ,रिस्पेक्ट ‘ या तत्वांचा वापर केला पाहिजे . रंग ,सौंदर्यप्रसाधने ,कृत्रिम सुगंधाचे स्प्रे ,मोबाईल ,संगणक अशा अनेक गोष्टींनी पर्यावरण धोक्यात येते ,त्यामुळे त्यावर आपणच नियंत्रण ठेवले पाहिजे . सुबाभूळ पासून गप्पी माशांपर्यंत बाहेरच्या देशातून आयात केलेल्या अनेक गोष्टींनी पर्यावरणाला धोकाच वाढला . पाण्याच्या ,शीतपेयांच्या बाटल्यांचा पुनर्वापर केला पाहिजे. अन्न वाया घालवता कामा नये ‘असेही डॉ हेमा साने यांनी सांगितले. ‘देवराई’ ट्रस्ट तर्फे देशी वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पुणेकर मोठ्या संख्येने महोत्सवाला उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या’ शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करा,भाजपची मागणी

News Desk

सचिन वाझे अटक प्रकरणात शरद पवार आणि अनिल देशमुख काय म्हणाले ?

News Desk

आशिष शेलारांनी घेतली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट

News Desk