HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे अटक प्रकरणात शरद पवार आणि अनिल देशमुख काय म्हणाले ?

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी राज्यातील वातावरण चिघळून निघाले होतं.ATS आणि NIA कडून यासंदर्भातला तपास सुरू आहे.काल दिवसभर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॅंट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. यानंतर आता भाजप आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हकालपट्टीची मागणी भाजपने केला आहे.दुसरीकडे सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा यासंदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे.’ संबंधित प्रकरणाच्या चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलणं पुर्णपणे टाळलं आहे.आज बारामतीत माध्यमांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर प्रश्न विचारला असता,’तो स्थानिक विषय आहे. मी जास्त यावर भाष्य करणार नाही’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna

स्टेअरींग अजित पवारांकडे असलं तरी गाड्या आम्ही पुरवतो-संजय राऊत

News Desk

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराः खा. अशोक चव्हाण

News Desk