HW News Marathi
राजकारण

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

मुंबई | भिमाकोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले या नेत्यांच्या भूमिकांवरून राज्यभर वादळ उठले होते. मात्र प्रचारकी उडालेला धुरळा निवळल्यानंतर दलित आणि मराठा यांच्यात वाद लावून दरी वाढविण्यापेक्षा वाद मिटवून सामाजिक एकोपा निर्माण करणे हिताचे असल्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका योग्य असल्याची तरुणांना पटले आहे. त्यातून प्रबोधन झाल्याने मुंबईतील अनुशक्तीनगर येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सोडून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. भारिप बहुजन महासंघ सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांची मुंबई ठाणे नाशिक आदी जिल्ह्यांतून रामदास आठवलेंच्या संविधान बंगल्यावर रांग वाढू लागली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अनुशक्तीनगर तालुका अध्यक्ष गणेश गांगुर्डे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला . यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशीर्वाद घरून गणेश गांगुर्डेनी रिपाइं जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे, शिलाताई गांगुर्डे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रमेश घोक्षे, महावीर सोनवणे,लिंबराज गायकवाड, रमाकांत शिरोळे, दिनेश शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार असल्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची भूमिका योग्य असल्यानेच आपण रिपब्लिकन पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असल्याचे मनोगत गणेश गांगुर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे!

News Desk

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

News Desk

देशाच्या विविधतेला विरोध करत स्वतःला देशभक्त तर इतरांना देशद्रोही ठरविले जाते !

News Desk
क्राइम

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

News Desk

मुंबई – हत्येची शिक्षा भोगत असलेली कैदी मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या घटनेची साक्षीदार इंद्राणी मुखर्जीनं न्यायालयात ही धक्कादायक माहिती दिली. सत्र न्यायालयात इंद्राणी मुखर्जीनं सांगितलं की, कैदी मंजुळा शेट्येवर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. मंजुळाच्या गळ्याला ओढणी आवळून तिला बेदम मारहाण कऱण्यात आली. हा क्रुरपणा एवढ्यावरच थांबला नाही. मंजुळाच्या गुप्तांगामध्ये काठीनं हल्ला करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती यावेळी इंद्राणीनं न्यायालयाला सांगितली.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर इंद्राणीनं कारागृह प्रशासनानं मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयच्या न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्याचा, सोबतच तक्रार दाखल करण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचा आदेश दिला आहे. मंजुळाच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्युनंतर राज्यातील एकूणच तुरूंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Related posts

सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Aprna

उल्हासनगरच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला 4 लाख घेताना रंगे हात अटक

News Desk

चित्रपटात काम न मिळाल्याने विक्रांतने केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk