HW News Marathi
व्हिडीओ

Pratap Sarnaik यांच्यानंतर Raut यांचा ‘लेटरबॉम्ब’! शिवसेनेच्या बड्या नेत्यांवर नेमका कोणाचा दबाव?

शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे. संजय राऊतांचं हे पत्र सध्या जबरदस्त चर्चेत आलं आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप आणि महाविकासाघडी विरुद्ध भाजप असा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. कारण ह्यात संजय राऊतांनी काही मोठे गौप्यस्फोट, काही तक्रारी, काही दावे तर काही गंभीर आरोप केलेत. हे दोन पानी पत्रं त्यांनी ट्विटही केलेलं आहे. ते इंग्रजीत आहे. त्या पत्रात राऊतांनी ईडी, सीबीआयसारख्या (ED, CBI) संस्थांचा वापर करुन केंद्र सरकार कसा त्यांचा, त्यांच्या नातेवाईकांचा छळ करतंय, यासह महाराष्ट्रातलं सध्याचं ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा म्हणून काही जण कसे त्यांना भेटलेत याचा दावा केलाय. संजय राऊतांच्या या पत्राने मोठी खळबळ उडालेली असताना आज आपण या प्रकरणाविषयी अनेक गोष्टींबाबत बोलणार आहोत. सर्वप्रथम राऊतांच्या पत्रात नेमके काय मुद्दे आहेत ते आपण ढोबळपणे पाहुयात त्यानंतर ह्यावर आलेल्या प्रतिक्रिया थोडक्यात पाहूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि संजय राऊत अशा शिवसेनेच्या दोन्ही बड्या नेत्यांवर भाजपने आणलेल्या दबावावर आपण बोलणार आहोत. आता सरनाईकांचा ह्यात काय संबंध? जाणून घेऊया

#PratapSarnaik #SanjayRaut #UddhavThackeray #LetterBomb #VenkaiahNaidu #Shivsena #BJP #ModiGovernment #DevendraFadnavis #BJPMAharashtra #MVA #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP – Jayant patil |भाजपचे नेते आमच्या संपर्कात , राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

Gandhi यांनी देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूस बोलू शकतो! – Jitendra Awhad

News Desk

हल्लेखोर रेतीतस्करांसोबत पोलीसांची जंगी Party

News Desk