HW News Marathi
कृषी

शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास विदेश दौ-यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

उत्तम बाबळे

नांदेड :- शेतकऱ्यांना विविध देशातील तंत्रज्ञान कळावे या उद्देशाने देशाबाहेरील शेती विषयक अभ्यास करण्यासाठी विदेश दौरा शासनाच्या वतीने नियोजन करण्यात येते. यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी गुरुवार ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

कृषि विभागाच्यावतीने सन २०१७ – १८ या वर्षासाठी इस्त्राईल, जर्मनी / नेदरलँड आणि ऑस्ट्रोलिया या देशांत अभ्यास दौऱ्यांचे नियोजन केले आहे. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीतजास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. या दौऱ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे पासपोर्ट, विमा पॉलिसी, स्वत:चे नाव असलेला सात-बारा व नमुना आठ अ असणे आवश्यक आहे. प्रस्ताव सादरकर्ता अर्जदार हा २५ ते ६० वर्षे वयोगटातील शेतकरी असावा. त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन हे शेती असावे. तसेच तो शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थेत नोकरीस, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यवसायीक नसावा.

शेतकऱ्यांनी विहित प्रपत्रातील परिपुर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ

News Desk

नांदेड जिल्ह्यात शेतकरी पीक कर्ज माफीचे ऑनलाईन अर्ज सूरू

News Desk

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

मोदी सरकारला मोठा धक्का ! कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची अंतरीम स्थगिती

News Desk

#DelhiResult : ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार !

swarit

“एक आदिवासी मुख्यमंत्री असल्यामुळे त्रास देत आहेत”, हेमंत सोरेन यांचा आरोप

Aprna