HW News Marathi
कृषी

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा | नांदुरा तालुक्यातील वाडी येथील रामेश्वर साहेबराव खाडे यांनी आज सत्यवान तोताराम खाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सद्या खरीप हंगाम जवळ आला असून सरकारचे कर्जमाफीचे घोंगडे अद्याप भिजत असल्याने बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे पेरणी कशी करायची या द्विधा मनस्थितीत सापडल्याने या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

रामेश्वर यांचे वडील साहेबराव शामराव खाडे यांचे नावे मौजे वाडी येथे २.०३ हेक्टर शेती आहे. यावर्षी त्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. त्यांच्या शेतावर स्टेट बँक ऑफ इंडिया नांदुरा शाखेचे सन २०१२-१३ मध्ये ३० हजार रुपयांचे कर्ज असून कर्जमाफीबाबत कोणतेही पत्र बँकेकडून अद्यापपर्यंत त्यांना प्राप्त झाले नव्हते. कर्जमाफी नाही त्यातच जवळ पैसे नसल्याने पेरणी करावी तरी कशी या चिंतेने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

News Desk

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी डोंगरे 

News Desk

केवळ 15 गुंठे जमीनमुळे मजूर झाला बागायतदार

News Desk