HW News Marathi
कृषी

केन हार्व्हेस्टरला मोठी मागणी

पुणे : उस तोडणीची खर्च आवाक्याबाहेर जातो, त्यात मजुर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सक्षम होण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी दोनशे अब्ज रुपयांची गुंतवणूक करून उस तोडणी यंत्र खरेदी केले आहे.राज्यात यंदा किमान ९ लाख हेक्टरवरील ऊस तोडावा लागणार आहे. जादा उसामुळे तोडीसाठी हार्वेस्टरला मागणी वाढणार असून २३८ हार्वेस्टरचा वापर होण्याची शक्यता आहे. यात २०४ हार्वेस्टर शेतकऱ्यांचे तर सात हार्वेस्टर शेतकरी समूह गटाचे असतील. साखर कारखान्यांकडेदेखील हार्वेस्टरची संख्या वाढते आहे. स्वमालकीचे ४१ हार्वेस्टर आतापर्यंत साखर कारखान्यांनी वापरात आणले आहे. सर्वसाधारणपणे शक्तिमान कंपनीचा हार्वेस्टर ९० लाखाच्या पुढे तर जॉन डिअरच्या हार्वेस्टरची किंमत सव्वा कोटी रुपयांच्या पुढे आहे.

‘केवळ शेतकरीच नव्हे तर राज्यातील सात शेतकरी गट समूहदेखील ”केन हार्वेस्टिंग”मध्ये उतरले आहेत. या समूहांनी स्वतःचे हार्वेस्टर खरेदी करून उत्पन्न मिळवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी १०० पेक्षा कमी शेतकऱ्यांकडे स्वतःचे केन हार्वेस्टर होते. आता २०४ शेतकऱ्यांनी हार्वेस्टर खरेदी केले आहेत. एका हार्वेस्टरसाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक असून भविष्यात ही गुंतवणूक अजून वाढेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk

‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

News Desk
महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू कालवश

News Desk

मुंबईः ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्याने काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर आज पहाटे साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचे पार्थिव वांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे.

साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका,नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून लेखन केले. त्यांच्या‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली. ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक,श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते

 

Related posts

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, शरद पवारांनी केलं सेनेचं कौतुक

News Desk

उमरगा MIDC मधील जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची मालमत्ता EDकडून जप्त

Manasi Devkar

सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज! – प्रविण दरेकर

Aprna