HW News Marathi
कृषी

स्वाभिमानीचे आंदोलन मागे, दुधाला मिळणार २५ रुपये दर

नागपूर | राज्यात दुधाला प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या या तीव्र आंदोलनाला अखेर यश आले आहे. गुरुवारी राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे. दूध दरवाढीचा हा निर्णय २१ जुलैपासून लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना २५ रुपये प्रति लिटर प्रमाणे भाव द्यावा लागणार आहे. गुरुवारी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत तशी घोषणा देखील केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात तब्बल ४ दिवस आंदोलन सुरुच ठेवले होते. दरम्यान अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखण्यात आले. मात्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये दूधटंचाई जाणवली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात तातडीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.

तुर्तास दुधाला दिलेली दर वाढ समाधानकारक आहे . तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना मी तीन-चार पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारला आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन मागे घेत आहोत अशी प्रतिक्रीया प्रसार माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नांदेड जिल्ह्यात शेतकरी पीक कर्ज माफीचे ऑनलाईन अर्ज सूरू

News Desk

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

News Desk

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी डोंगरे 

News Desk
देश / विदेश

ठाकरेंचा मोदींना पाठिंबा

News Desk

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकार विरोधात अविश्वास लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मोदी सरकारने मित्र पक्षाला हिन वागणूक दिल्यामुळे नाराज मित्र शिवसेना नेहमीच मोदी सरकारव टीक करत आली आहे. परंतु मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दरम्यान मोदी सरकारच्या बाजून मतदान करण्याचा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.

यासाठी सेनेने त्यांच्या खासदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला आहे. त्यामुळे अविश्वासाचा प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे. शिवसेनेनेच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून अविश्वासाच्या प्रस्तावाबाबत काय घडेल हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

तेलुगू देसमचा अविश्वासचा प्रस्ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकार विरोधात तेलुगू देसम पक्षाने लोकसभेतील अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. या ठरावाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अविश्वासाचा प्रस्ताव म्हणजे काय आणि हा ठराव लोकसभेतच का मांडावा लागतो जाणून घ्या.

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?

केंद्र सरकार विरोधात लोकसभेत आणि राज्य सरकार विधानसभेमध्ये अविश्वासचा प्रस्ताव सादर केला जातो. हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यानंतर सत्ताधारी पक्षाला आपले बहुमत सिद्ध करावे लागेत. हा प्रस्ताव स्वीकारण करणे अथवा नाकारणे हे सर्वाधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो.

अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सदस्यांना कोणतेही कारण द्यावे लागत नाही. सरकारकडे बहुमत नाही किंवा सरकार सभागृहाचा विश्वास गमावला आहे. असे जेव्हा विरोधी पक्षाला वाटते. तेव्हा अविश्वासाचा प्रस्ताव आणला जातो. अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याबाबत संसदेतील कामकाजासंबंधिच्या नियम १९८ मध्ये या बदल स्पष्ट करण्यात आले आहे.

या नियमानुसार हा प्रस्ताव आणण्यासाठी संसद सदस्यांना सकाळी दहा वाजपण्यापूर्वी लेखी नोटीस द्यावी लागते. लोकसभा अध्यक्ष ही नोटीस सभागृहासमोर वाचून दाखवितात. अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यासाठी किमान ५० सदस्यांना पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव सभागृहात स्वीकारण्यात आल्यावर दहा दिवसांत त्यावर चर्चा घेण्याची तरतूद आहे. जर असे झाले नाही तर अविश्वास प्रस्ताव असफल ठरला असे मानले जाते. या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सरकार बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो.

अविश्वास प्रस्ताव लोकसभेतच का मांडतात?

लोकसभा हे प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेल्या सभासदांचे सभागृह आहे. तर राज्यसभेमध्ये अप्रत्यक्षपणे लोकांनी निवडून दिलेले सभासद असतात. त्यामुळे लोकसभेत बहुमत मिळेपर्यंत एखाद्या पक्षाला सत्तेत राहता येते नाही. त्यामुळे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो.

Related posts

इस्रोकडून तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीभोवतीच्या कक्षेत केले स्थापित

Aprna

‘शरद पवार आणि अमित शहांच्या भेटी मागचं कारण उघड’, पवार म्हणाले….

News Desk

दादरा नगर हवेलीत घुमतोय शिवसेनेचा आवाज

News Desk