HW News Marathi
कृषी

केवळ 15 गुंठे जमीनमुळे मजूर झाला बागायतदार

सांगली- जिल्ह्यातील गोटखिंडी येथील अमोल दिलीप धेंडे हा तरूण एकेकाळी शेतमजूर म्हणून राब-राबत असे. आता मात्र तो प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जात आहे. भाजीपाला उत्पादनातून त्याने हे यश प्राप्त केले आहे. यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती तर सुधारलीच आहे, शिवाय सात जणांना त्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

सांगली जिल्ह्यात पेठ-सांगली रस्त्यावर इस्लामपूर शहरापासून पुढे १२ किलोमीटरवर गोटखिंडी फाटा लागतो. गावचा तसा बागायती उसाचा पट्टा. या गावात अमोल धेंडे शेतमजूर म्हणून काम करत होता. अमोल आपल्या कुटुंबासह राबतो हे गावातील मित्रांना माहीत होते. गावातील एक शेतकऱ्याची १५ गुंठे जमीन मुदत खरेदीसाठी निघाली होती. अमोलच्या कुटुंबाने रोजगारातून काही रक्कम गाठीला ठेवली होती. मित्रांनी काही रक्कम दिली आणि ते १५ गुंठे क्षेत्र मुदत खरेदी केले. त्या ठिकाणी पाण्याची सोय होती. पहिल्याच वर्षी हळदीचे पीक घेतले. संपूर्ण कुटुंबाने राबून ते चांगले आणले. पहिल्याच वर्षी सव्वा लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. याच प्रयोगानंतर धेंडेकुटुंबाचा इतरांच्या शेतातला रोजगार संपला. शेतीत आणखी काही करण्याची उमेद वाढली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

केन हार्व्हेस्टरला मोठी मागणी

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी

swarit
नवरात्रोत्सव २०१८

‘विक्रोळीच्या आई शिवाई’चे हे देखणे रूप

swarit

मुंबई । विक्रोळी पूर्व येथील कन्नमवारनगर परिसरात १९७९ साली शिवाई मित्र मंडळाची स्थापना झाली. याच शिवाई मित्र मंडळाची देवी ‘विक्रोळीची आई शिवाई देवी’ म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. शिवाई देवीची ज्या चौकात स्थापना केली जाते तो चौक ‘शिवाई चौक’ याच नावाने ओळखला जातो. यंदा या मंडळाने आपल्या ३९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

खरंतर १९७९ सालात जेव्हा ‘शिवाई मित्र मंडळा’ची स्थापना केली गेली तेव्हा त्या काळच्या काही लोकांनी मिळून येथे देवीचा फोटो लावून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८० सालापासून २ फुटाची देवीची मूर्तीची स्थापना करून हा नवरात्रोत्सव पार पडला. मात्र त्यानंतरच्या वर्षांपासून शिवाई देवीची ९ फुटांची अत्यंत सुबक, सुंदर अशी मूर्ती मंडपात विराजमान होऊ लागली.

शिवाई देवीची ९ फुटांची ही अत्यंत प्रसन्न आणि सुंदर, देखणे अशी मूर्ती वर्षानुवर्षे ‘मूर्तिकार खातू’ यांच्याच कारखान्यात घडविली जात आहे. ‘शिवाई देवी’च्या मंडपात होणारा गरबा हा अत्यंत प्रसिद्ध आहे. शिवाई मित्र मंडळाकडून दरवर्षी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी काही हलक्याफुलक्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

Related posts

मुंबईत आदिशक्तीच्या आगमनाला सुरुवात 

News Desk

आजचा रंग गुलाबी, ‘सिद्धीदात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

विक्रोळीच्या दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल

News Desk