HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

मुंबईत आदिशक्तीच्या आगमनाला सुरुवात 

मुंबई । ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्व दूर आता चाहूल लागली ती आदिशक्तीच्या आगमन सोहळ्याची आणि आता नवरात्रोत्सवासाठी संपूर्ण मुंबईकर सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा नवरात्रोत्सव मंडळेही सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अधिकाधिक भक्तांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सध्या केला जात आहे. सामाजिक भान राखत नवरात्रौत्सव साजरा करणारी मंडळे ही मुंबईची खास ओळख आहे. अंबामातेच्या आगमनासाठी सर्व मुंबईकर सज्ज झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत नवरात्रोत्सवाची धूम ही काही उपनगरांची खास ओळख बनली आहे. त्यात कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, बोरीवली, विलेपार्ले, गोरेगाव, घाटकोपर, अंधेरी यांचा क्रम लागतो. नवरात्रोत्सवात गरबा खेळून मुंबईकर रात्र जागवतात. तर काही मंडळे ही गरब्यासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे गरबा खेळायला जाण्यासाठीही अनेकांनी आधीपासून सेटिंग करुन ठेवलेली आहेत. तरुणांच्या बरोबरीनेच महिलाही गरबा खेळण्यासाठी अधिक इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेण्ड सेट झाला आहे. त्यामुळे नसलेल्या रंगांच्या साडी, ड्रेसची खरेदीही महिलांनी उत्साहांनी केली आहे. यात पुरुषही मागे नाहीत. अनेकांनी त्या -त्या रंगाचे शर्ट खरेदी केले आहेत.

काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पाद्यपूजन आणि आगमन सोहळ्यांची प्रथा सुरु झाली. हळूहळु या पाद्यपूजन आणि आगमन सोहळ्यांचे स्वरुप बदलून मोठ्या इव्हेंटमध्ये त्याचे रुपांतर होण्यास सुरुवात झाली. त्याचेच अनुकरण करत यंदा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनीही सुवर्णसंधी साधत जोरदार आगमन सोहळ्यांचे आयोजन केले आहे. तसेच, ठिकठिकाणी आदिमातेचे पाद्यपूजन सोहळेही रंगले. काही मंडळांनी विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी आधीच सुरू केली आहे.

पितृपक्षामुळे मंदावलेली बाजारपेठ पुन्हा फुलण्यास सुरुवात

आदिमाता दुर्गेचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे मुंबईच्या बाजारात लगबग दिसू लागली आहे. घराघरांत घटस्थापना करून देवीच्या नावाचा जागर करण्यासाठी व विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी भाविकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पितृपक्षामुळे मंदावलेली बाजारपेठ पुन्हा फुलण्यास सुरुवात झाली आहे.

पितृपक्षात भाजीबाजार सोडला तर अन्य क्षेत्रातील व्यवहार तसे थंडावलेलेच असतात. या काळात सामान्य नागरिक नवीन वस्तुंची सहसा खरेदी करीत नाहीत. मात्र, आता नवरात्रीच्या आगमनामुळे बाजारपेठ नव्याने बहरली आहे. नवरात्रोत्सव म्हणजे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. घरोघरी घटस्थापना करुन विधीवत पूजन केले जाते. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या घटस्थापनेसाठी बाजारपेठेत गर्दी व्हायला लागली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवोदित मंडळाची माऊली

News Desk

…म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

News Desk

पद्मश्री पी.व्ही. सिंधूचा रोमांचक प्रवास

News Desk