HW News Marathi
कृषी

तूर, उडीद दर हजारांनी घसरले, विक्रीची तूर्त घाई नको

मुंबई- खरीप हंगामातील उदीड आणि मूगाचे दर एक हजार रुपयांनी खाली आले असून ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने या वर्षी हमीभावाने तूर, उदीड खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

राज्यात मूग आणि उडीद खरेदीसाठीच्या केंद्रांची संख्या निश्‍चित करण्यात आली नाही. मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनझाले तिथे आणि महत्त्वाच्या खरेदी केंद्रांवर मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी करण्याचे राज्य सरकारने निश्‍चित केल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार लातूर बाजार समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नवीन उडीद बाजार समितीत येण्यास सुरवात झाली असून, लातूरमध्ये उडदाला ४२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या दरात आणि हमीभावामध्ये तब्बल १२०० रुपयांचा फरक असून उडदाचा हमीभाव ५४०० रुपये निश्‍चित करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांनी सध्या उडीद, मुगाची बाजारात विक्री करण्याची घाई करू नये. तरीही ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे, त्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने उडीद, मुगाची विक्री करण्यापेक्षा शेतमाल तारण योजनेचा लाभ घेऊन आपली गरज भागवावी, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Farmers protest : शेतकऱ्यांचा दिल्लीत हल्लाबोल, आज संसद भवनाला घेराव

News Desk

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या नियोजनाकडे लक्ष द्या – जिल्हाधिकारी डोंगरे

News Desk

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

News Desk