HW News Marathi
Covid-19

राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही; निर्बंध कठोर करणार! – राजेश टोपे

मुंबई | राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र, निर्बंधात वाढ करणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. कोरोना निर्बधांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आज (१ जानेवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच ओमायक्रॉन संसर्गाचा वेग वाढत असल्याचे टोपेंनी सांगितले. गेल्या दोन दिवसात रुग्णांचा आकडा दुप्पट होत असून राज्यात आज कोरोना रुग्णांची संख्या १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी लॉकडाऊनविषयी भीती बाळगू नये, असे आवाहनही टोपेंनी राज्यातील जनतेला केले आहे. लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थचक्रावर होते, असे मत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. राज्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.   

“डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या रुग्णाची टक्केवारी समजने गरजेचे आहे. कारण त्यावर रुग्णांवर उपचार अवलंबून आहेत. ओमायक्रॉन हा सोम्य स्वरुपाचा असून त्या रुग्णांना त्या पद्धतीचे उपचार दिले जातात. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सरकारने जे निर्बंध कठोरपणे पालन करणे गजचे आहे. हेच शासनासमोर सर्वात मोठे आव्हानाचा विषय आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू न देणे हा शासनासमोरच प्रथम प्राधान्य आहे. मुंबईचा एका दिवसाचा पॉझिटिव्ह रेट हा १० ते ११ वर गेला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट हा ५ वर गेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे याठिकाणी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याची माहिती टोपेंनी दिली आहे.” 

सुद्धा लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झालेली नाही

दरम्यान, “कोरोना रुग्णांची वाढती संख्येमुळे लागणारे बेड आणि ऑक्सीजन यावर पुढील महत्त्वाचे निर्णय असल्याचे संकेत टोपेंनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. जरी कोण लॉकडाऊन बद्दल बोलत असेल तर आता लॉकडाऊचा विषयच नाही. त्यामुळे लॉकडाऊनची भीती माध्यमांनी देखील खालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल (३१ डिसेंबर) झालेल्या बैठकीत सध्या लॉकडाऊनसंदर्भाच चर्चा झालेली नाही. निर्बंध लावले पाहिजे, ज्या दिवशी ७०० मेटरिक टन ऑक्सीजनची मागणी होईल. त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल, अशा पद्धतीने ठरविण्यात आलेल्याचे टोपेंनी सांगितले. त्यामुळे इतक्या लवकर लॉकडाऊचा विषय नाही. लॉकडाऊनचा परिणाम हा राज्याच्या अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो, त्यांच्यावर होतो. त्यामुळे लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनची झळ पाहिलेली आहे. लोकांची काळजी अधी घ्याची असल्याचे कालच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकी ठरले आहे. परंतु अशा पद्धतीचे कठोर निर्णय घेण्याची वेळे आली तर ते घ्याचे आहेतच. निर्बंध हा देखील त्यातला महत्त्वाचा भाग असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध

तसेच राज्यात विवाह, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. आता निर्बंध आणखी कठोर करण्याबद्दल काम करत आहोत. यावरून कोरोनावर नियंत्रण आले तर ठिक आहे. रेस्टरेंट, सिनमागृह, शाळा आणि कॉलेज या गोष्टीवर बघावा लागेल. त्याचबरोबर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करायचे आहे. त्यासाठी आम्ही ३ जानेवारीपासून त्यांचे नियोजन करणार आहोत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कलम ३७० हटवताना दाखवलेली हिंमत आता मराठा आरक्षणासाठी दाखवा !

News Desk

OBC आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू । प्रीतम मुंडे

News Desk

कोकणात जाण्यासाठी बुकिंग कधी सुरू होणार, काय नियम? जाणून घ्या…

News Desk