HW News Marathi
क्राइम

तक्रार मागे घे , नाहीतर टांगून मारेल

अभिराज उबाळे

पंढरपूर :- शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे नाही तर तुला टांगून मारेल अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्यावर शेतकऱ्याने केलाय . तसेच आमदार नारायण पाटील यांच्या पासून आपल्या जीवाला धोका आहे असा तक्रारी अर्ज रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलीय . नारायण पाटील हे करमाळ्याचे आमदार आहेत .

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे . या शेतातील पाईप लाईन सचिन नरोटे यांनी फोडली . या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला . तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून आरोपी कांबळेंना धमकावत होते . शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी देखील मोबाईल वरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारी अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केलाय . आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळेंनी केलीय .

शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आणि रस्त्यावर रान उठवत आहे . सरकारमध्ये असून देखील शेतकऱ्यांच्यासाठी सरकार विरोधी भूमिका सेने घेत आहे . तर दुसरीकडे त्यांच्याच आमदारांनी शेतकऱ्याला दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे सेने काय भूमिका घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलाय . २ एप्रिल रोजी काँग्रेस राष्ट्रवादी सह विरोधी पक्षांची शेतकरी संघर्ष यात्रा सोलापुरात येत आहे . या धमकी प्रकरणामुळे विरोधी पक्षाला चांगलेच कोलीत मिळालाय . नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीत आमदार नारायण पाटील यांनी भाजप महाआघाडी विरोधी भूमिका घेतली होती .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेता आदित्य पंचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

स्व:ताच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

News Desk

ट्रक व मॅजिक धडकेत २ ठार ४ जण गंभीर जखमी 

News Desk
महाराष्ट्र

मन हेलावणारी पोलीस भरती

News Desk

अमरावती येथील पोलिस मुख्यालय मैदानावर शनिवारी मन हेलावणारे चित्र पोलिस भरतीदरम्यान दिसून आले.धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रिती कुमरेही सव्वा वर्षाच्या‘परी’ला घेऊन भरतीसाठी आली होती.

पोलिस मुख्यालयाच्या शंभर मीटर धावण्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रिती यांची आठशे मीटर चाचणीसाठी निवड झाली.या चाचणीपूर्वी तिने आपली‘परी’महिला पोलिसांच्या स्वाधीन केली धावण्याच्या चाचणीसाठी सज्ज झाली.दरम्यान,‘परी’ला आई दिसल्याने ती रडायला लागली.पोटासाठी एकीकडे चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी प्रिती जीव तोडून धावत होत्या.परंतु त्यांची नजर मात्र सतत रडणाऱ्या‘परी’कडे भिरभिरत होती.

Related posts

भाजप विधीमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी बैठक

News Desk

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

News Desk

महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर उद्या नाना पटोले राज्यपालांना भेटणार !

News Desk