HW News Marathi
क्राइम

नांदेड जिल्ह्यात ८ मे च्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

उत्तम बाबळे

नांदेड :- जिल्ह्यात सोमवार ८ मे २०१७ रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आगामी काळातील उत्सव, मिरवणुकांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात मंगळवार २५ एप्रिल २०१७ ते सोमवार ८ मे २०१७ रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी; कार्यालय आणि निवावसस्थानी सुरक्षेत वाढ

Aprna

१७ दिवसांनंतर आज जामिनावर आर्यन खान येणार कोठडीतून बाहेर?

News Desk

माहूरमध्ये ३ लाख ९८ हजाराच्या मुद्देमालासह ७ जणांना अटक

News Desk
महाराष्ट्र

अंबाबाई… कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे – अजित पवार

News Desk

कोल्हापूर – राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे, असं साकडं कोल्हापूरच्या अंबाबाईला घातल्याचं राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून कोल्हापूरमधून सुरूवात झाली आहे. कोल्हापूरातील संघर्षयात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे ! असे साकडे कोल्हापूरच्या आंबाबाईला घातले आहे, असेही अजित पवार यांनी कोल्हापूरातील संघर्ष यात्रेमध्ये म्हटले. तुरडाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात अजित पवार म्हणाले की, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तुरडाळ खरेदी करण्यामध्ये कमी पडल्याचे मान्य केले आहे. पण, शासनाला केवळ चूक मान्य करुन चालणार नाही तर तुरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात कर्जमाफी केली, मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या अभ्यासासाठी अडीच वर्षे का लागतात? असा सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

सत्तेच्या जोरावर राज्य शासनाला शेतकऱ्यांची आंदोलने चिरडून टाकता येणार नाहीत, तुरडाळ संपेपर्यंच ती खरेदी केंद्राच्या माध्यमातून विकत घेण्याचा शब्द देऊनही राज्य शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शासनाने तुरडाळ केंद्रे त्वरित सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा राज्य शासनाविरुद्धचा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर पत्रकार परिषदेत दिला. विखे म्हणाले की,उत्तर प्रदेशप्रमाणे एक लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य नाही. त्यांचा सात बारा पूर्ण कोरा होईपर्यंत संघर्ष लढा सुरुच राहिल. १ मे राजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळावा या मागणीचा ठराव संमत करुन शासनाकडे पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Related posts

सामान्य नागरिक समोर ठेवून सुशासन नियमावली तयार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Aprna

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

News Desk

“नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna