HW News Marathi
क्राइम

५४ वर्षे भारतात राहिलेल्या चीनी गुप्तहेराचा मृत्यू

भोपाळ : १९६२ च्या भारत- चीन युद्धादरम्यान, भारतीय सैन्याने पकडलेल्या चीनी सैनिक आणि गुप्तहेराचा ५४ वर्षांनी बुधवारी भारतातच मृत्यू झाला. मायदेशात परत जाण्याची त्याची इच्छा अखेरपर्यंत अपूर्णच राहिली.

दिव शू नाग जूंग या चायनीज सैनिकाला भारतीय लष्कराने पाच दशकापूर्वी हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली. या ५४ वर्षात ते एकदाही मायदेशी गेले नाहीत. आपल्या मातृभूमीत जाऊन बालपण घालवलेल्या घराला भेट देण्याची त्याची इच्छा होती. जूंग यांचा सहकारी चीनी सैनिक वांग की हा पाच दशकांनी चीनमध्ये पोहचल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे एकदा तरी मायदेशी जाण्याचं जूंग यांनी ठरवलं होतं. पण ते शक्य झालं नाही.

बुधवारी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील राहत्या घरी मेंदूतील रक्तस्रावाने त्यांचं निधन झालं. वांग की आणि त्याचे कुटुंबीय जूंग यांच्या अंतिम संस्काराला उपस्थित होते. जूंगला भारतातून कायमचे निघून जायचे होते. मला परत चीनला जायचे आहे. पण मला चीन सरकार माघारी पाठवणार तर नाही ना, याची मला चिंता भेडसावतेय, असं जूंग म्हणायचे.

३ जानेवारी १९६३ मध्ये लडाख येथे जूंग यांना अटक झाली होती. तुरुंगातून सोडलेल्या या चीनी सैनिकांना १९६८ मध्ये बालाघाटमधील तिरोडी गावात हलविण्यात आले होते. या ठिकाणीच एका छोट्याशा दुकानात जूंगने त्यांचं आयुष्य घालवलं. दुकानापासून ५०० मीटरवर वांग की राहत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माझ्यावर १०० जणांनी बलात्कार केलेत

News Desk

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी

Aprna

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

News Desk
राजकारण

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk

लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वादग्रस्त विधान केल्यानंतर या प्रकरणाची राजकारणात जोरदार चर्चा रंगलेली होती. हे प्रकरण शांत होत असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केले आहे. ‘हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते’ असल्याचे साय यांनी म्हटले आहे.

अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असते. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे. ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रे आहेत, असे साय यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केले. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते, असे नंदकुमार साय यांनी म्हटले आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk

शाहिद आफ्रिदीचे ‘चांदतारे’, सामनामधून ठाकरेंनी घेतला समाचार

News Desk