HW News Marathi
क्राइम

५४ वर्षे भारतात राहिलेल्या चीनी गुप्तहेराचा मृत्यू

भोपाळ : १९६२ च्या भारत- चीन युद्धादरम्यान, भारतीय सैन्याने पकडलेल्या चीनी सैनिक आणि गुप्तहेराचा ५४ वर्षांनी बुधवारी भारतातच मृत्यू झाला. मायदेशात परत जाण्याची त्याची इच्छा अखेरपर्यंत अपूर्णच राहिली.

दिव शू नाग जूंग या चायनीज सैनिकाला भारतीय लष्कराने पाच दशकापूर्वी हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली. या ५४ वर्षात ते एकदाही मायदेशी गेले नाहीत. आपल्या मातृभूमीत जाऊन बालपण घालवलेल्या घराला भेट देण्याची त्याची इच्छा होती. जूंग यांचा सहकारी चीनी सैनिक वांग की हा पाच दशकांनी चीनमध्ये पोहचल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे एकदा तरी मायदेशी जाण्याचं जूंग यांनी ठरवलं होतं. पण ते शक्य झालं नाही.

बुधवारी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील राहत्या घरी मेंदूतील रक्तस्रावाने त्यांचं निधन झालं. वांग की आणि त्याचे कुटुंबीय जूंग यांच्या अंतिम संस्काराला उपस्थित होते. जूंगला भारतातून कायमचे निघून जायचे होते. मला परत चीनला जायचे आहे. पण मला चीन सरकार माघारी पाठवणार तर नाही ना, याची मला चिंता भेडसावतेय, असं जूंग म्हणायचे.

३ जानेवारी १९६३ मध्ये लडाख येथे जूंग यांना अटक झाली होती. तुरुंगातून सोडलेल्या या चीनी सैनिकांना १९६८ मध्ये बालाघाटमधील तिरोडी गावात हलविण्यात आले होते. या ठिकाणीच एका छोट्याशा दुकानात जूंगने त्यांचं आयुष्य घालवलं. दुकानापासून ५०० मीटरवर वांग की राहत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोशल मीडियातून खून केल्याची कबुली, आरोपी पोलिसांना सापडेना

News Desk

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

Chetan Kirdat

अपहरण झालेल्या मुलाची चार तासात सुखरुप सुटका; जालना पोलिसांची कारवाई

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

ग्राहकांना मोबाईलवरील एसएमएसद्वारे पत्त्याची दुरुस्ती करता येणार

News Desk

दोन कोटी 90 लाख जुन्या नोटांसह तीघांना अटक

News Desk

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

Gauri Tilekar