HW News Marathi
क्राइम

नालासोपारा प्रकरणातील आरोपी सुजीत कुमार यांना मारहाण  

मुंबई | नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपी सुजीत कुमार याला पोलिसांनी कंबरेच्या पट्टा आणि काठीने मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने कुमार याला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविले आहे.

पोलिसांनी कुमारला जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक अटक केले होते. कुमार यांना १२ सप्टेंबरला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आपल्याकडे घेतला आहे. दहशतवादी विरोधी पथकाने आज (१७ सप्टेंबर) कुमार यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात नेण्यात आले होते.

तसेच नालासोपारा स्फोटके प्रकरणी जळगावमधून ताब्यात घेत अटक केलेला आरोपी लीलाधर उर्फ विजय लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठड़ीमध्ये २४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, शहारुख खान चा मुलगा ताब्यात?

News Desk

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्यांसह 15 जणांना अटक

News Desk
मुंबई

ए पी मंडईतील व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना दिलासा

News Desk

मुंबई | धोबीतलाव येथील आदमजी पीरभाई मंडईची जागा महादेवराव सिंधिया यांच्या मालकीची होती. या मंडईचा ४ लाख ६९ हजार मालमत्ता कर थकीत राहिल्याने ही जागा १९८२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने अधिग्रहण करून म्हाडाच्या साहाय्याने “पंतप्रधान अनुदान प्रकल्प” या योजनेतून विकसित केली होती. स्थानिक भाडेकरूंना कायमस्वरूपी जागा देऊन उरलेली जागा म्हाडा व महापालिकेने विभागणी करून घेतली होती. ही मंडई धोकादायक ठरवून त्यातील एक इमारत तोडली आणि व्यापाऱ्यांना रस्त्यावर येण्याइतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना वीज व पाण्यापासून वंचित ठेवले आहे. व्यापारीवर्ग ४० वर्षांपासून ह्या मंडईत व्यापार करीत आहेत. त्यांना महानगरपालिकेकडून दादर येथील प्लाझा व नळबाजार या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. तळमजल्यावर मंडई व वरचे पाच मजले म्हाडाचे आहे. ही इमारत दुरूस्ती साठी आहे अशी बतावणी व्यापाऱ्यांनी व स्थीनिक रहिवाश्यांनी केली आहे. आम्हाला येथेच जागा देऊन आम्हाला वीज, पाणी, कर पावती चालू करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून तिहेरी वादात अडकलेल्या आदमजी पिरभाई अर्थात ए पी मंडईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. घटनास्थळी व्यापाऱ्यांसह व सदनिकाधारकांची भेट घेत कॅबिनेट मंत्री तथा स्थानिक भाजप आमदार राज पुरोहित व भाजपा नगरसेविका रिटा मकवना यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही सर्वानी एकत्र या. आम्ही तुम्हांला १५ दिवसांत न्याय मिळवून देतो व महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी बोलून आपण याप्रकरणी तोडगा काढू’, असा विश्वास त्यांनी दिला आहे.

या प्रसंगी भाजपा आमदार राज पुरोहित,नगरसेविका -रिटा मकवना, महापालिका सहाययक अभियंता-सुनिल सरदार,म्हाडा मुख्य कार्यकारी अभियंता देशमुख, किशोर राठोड, स्टीव्हन फर्नांडिस, प्रकाश जाधव, सुरेश बाबू येडगे गिरीश दुबे आदी व्यापारी व महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.

“मी तुम्हांला ए पी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या व स्थानिक रहीवाश्यांचा पाठीशी कायम आहे.आणि या १५ दिवसांत न्याय मिळवून देणार व व्यापाऱ्यांना पाणी,वीज ,कर पावती चालू करून देणार”, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आणि भाजप आमदार राज पुरोहित यांनी दिली आहे.

“मंडईची जी जागा तोडली आहे तिथे व्यापाऱ्यांना शेड बांधून देणार व पाणी, त्याचप्रमाणे वीज यासाठी सतत पाठपुरावा सुरु आहे. व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देणार” अशी प्रतिक्रिया भाजपा नगरसेविका रिटा मकवना यांनी दिली आहे.

 

Related posts

सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार

News Desk

राष्ट्रवादीचा गड असलेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व

News Desk

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

Aprna