HW News Marathi
मुंबई

ए पी मंडईतील व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना दिलासा

मुंबई | धोबीतलाव येथील आदमजी पीरभाई मंडईची जागा महादेवराव सिंधिया यांच्या मालकीची होती. या मंडईचा ४ लाख ६९ हजार मालमत्ता कर थकीत राहिल्याने ही जागा १९८२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने अधिग्रहण करून म्हाडाच्या साहाय्याने “पंतप्रधान अनुदान प्रकल्प” या योजनेतून विकसित केली होती. स्थानिक भाडेकरूंना कायमस्वरूपी जागा देऊन उरलेली जागा म्हाडा व महापालिकेने विभागणी करून घेतली होती. ही मंडई धोकादायक ठरवून त्यातील एक इमारत तोडली आणि व्यापाऱ्यांना रस्त्यावर येण्याइतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना वीज व पाण्यापासून वंचित ठेवले आहे. व्यापारीवर्ग ४० वर्षांपासून ह्या मंडईत व्यापार करीत आहेत. त्यांना महानगरपालिकेकडून दादर येथील प्लाझा व नळबाजार या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. तळमजल्यावर मंडई व वरचे पाच मजले म्हाडाचे आहे. ही इमारत दुरूस्ती साठी आहे अशी बतावणी व्यापाऱ्यांनी व स्थीनिक रहिवाश्यांनी केली आहे. आम्हाला येथेच जागा देऊन आम्हाला वीज, पाणी, कर पावती चालू करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून तिहेरी वादात अडकलेल्या आदमजी पिरभाई अर्थात ए पी मंडईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. घटनास्थळी व्यापाऱ्यांसह व सदनिकाधारकांची भेट घेत कॅबिनेट मंत्री तथा स्थानिक भाजप आमदार राज पुरोहित व भाजपा नगरसेविका रिटा मकवना यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही सर्वानी एकत्र या. आम्ही तुम्हांला १५ दिवसांत न्याय मिळवून देतो व महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी बोलून आपण याप्रकरणी तोडगा काढू’, असा विश्वास त्यांनी दिला आहे.

या प्रसंगी भाजपा आमदार राज पुरोहित,नगरसेविका -रिटा मकवना, महापालिका सहाययक अभियंता-सुनिल सरदार,म्हाडा मुख्य कार्यकारी अभियंता देशमुख, किशोर राठोड, स्टीव्हन फर्नांडिस, प्रकाश जाधव, सुरेश बाबू येडगे गिरीश दुबे आदी व्यापारी व महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.

“मी तुम्हांला ए पी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या व स्थानिक रहीवाश्यांचा पाठीशी कायम आहे.आणि या १५ दिवसांत न्याय मिळवून देणार व व्यापाऱ्यांना पाणी,वीज ,कर पावती चालू करून देणार”, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आणि भाजप आमदार राज पुरोहित यांनी दिली आहे.

“मंडईची जी जागा तोडली आहे तिथे व्यापाऱ्यांना शेड बांधून देणार व पाणी, त्याचप्रमाणे वीज यासाठी सतत पाठपुरावा सुरु आहे. व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देणार” अशी प्रतिक्रिया भाजपा नगरसेविका रिटा मकवना यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलगी वाचवा मुलगी शिकवा संदेश देणारी मोटार सायकल रॅली

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

News Desk

कॉंग्रेसने उंदीर सोडले की काय | रामदास आठवले

News Desk