HW News Marathi
क्राइम

केवळ सहा महिन्यांमध्ये भारतात ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ले

नवी दिल्ली | भारतात जानेवारी ते जून या कालावधीत जवळपास ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. एफ-सेक्युअर या संस्थेने जगभरातील सायबर गुन्ह्यांचे आणि सायबर हल्ल्यांचा सर्व्हे केला आहे. एफ-सेक्युअर संस्थेने सादर केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अमेरिका, रशिया, चीन आणि नेदरलँड या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत. यातही रशियामधून भारतावर सर्वाधिक (२,५५,५८९) सायबर हल्ले करण्यात आले असल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ अमेरीका (१,०३,४५८), चीन (४२,५४४), नेदरलँड (१९,१६९) आणि जर्मनी (15,३३०) या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत.

भारतामधून देखील इतर देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतामधून ऑस्ट्रिया (१२,५४०), नेदरलँड (९,२६७), ब्रिटन (६३४७), जपान (४,७०१ ) आणि युक्रेन (३,७०८) या देशांवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आठ वर्षाच्या बालकाची निर्घृण हत्या

News Desk

शेवगाव आखेगाव रस्त्यावर दोघांचा खून

News Desk

चोरट्यांनी दरोड्याचं सोनं गहाण ठेवून विकत घेतला फ्लॅट

News Desk
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk

रायपूर | छत्तीसगढ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. परंतु मतदान केंद्रत गेलेल्या बहुतांश लोकांचे नावे मतदार यादीतून गहाळ झाले. त्यामुळे लोकांनी मतदान केंद्र बाहेर येऊन गोंधळ घातला. गेल्या २५ वर्षापासून छत्तीसगढमध्ये राहत असलेल्या लोकांची नावे देखील मतदार यादी नसल्याने लोकांमध्ये नाराजी दिसून आली असून हा सर्व प्रकार जगदलपूरच्या गांधी नगरमधील अनेकांची नावे मतदारयादीतून गायब लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मतदानाला दुपारी पर्यंत २५.१५ टक्के इतके मतदान झाले आहे.

छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

Related posts

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी ईडीकडून अटक

News Desk

यंदा बारामतीत भाजपचे कमळ फुलवू, मुख्यमंत्र्यांचा दावा

News Desk

राजीव गांधी यांच्या भारतरत्नवरुन आप’मध्ये वाद

News Desk