HW News Marathi
क्राइम

केवळ सहा महिन्यांमध्ये भारतात ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ले

नवी दिल्ली | भारतात जानेवारी ते जून या कालावधीत जवळपास ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. एफ-सेक्युअर या संस्थेने जगभरातील सायबर गुन्ह्यांचे आणि सायबर हल्ल्यांचा सर्व्हे केला आहे. एफ-सेक्युअर संस्थेने सादर केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अमेरिका, रशिया, चीन आणि नेदरलँड या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत. यातही रशियामधून भारतावर सर्वाधिक (२,५५,५८९) सायबर हल्ले करण्यात आले असल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ अमेरीका (१,०३,४५८), चीन (४२,५४४), नेदरलँड (१९,१६९) आणि जर्मनी (15,३३०) या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत.

भारतामधून देखील इतर देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतामधून ऑस्ट्रिया (१२,५४०), नेदरलँड (९,२६७), ब्रिटन (६३४७), जपान (४,७०१ ) आणि युक्रेन (३,७०८) या देशांवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलिगड पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर

swarit

तीन महिन्याच्या बाळाच्या आणि पतीच्या गळयावर चाकू ठेवून महिलेवर सामूहिक बलात्कार

News Desk

उमरीमध्ये 9 लाखाच्या गुटख्यासह दोघांना केले अटक 

News Desk