HW News Marathi
क्राइम

केवळ सहा महिन्यांमध्ये भारतात ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ले

नवी दिल्ली | भारतात जानेवारी ते जून या कालावधीत जवळपास ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. एफ-सेक्युअर या संस्थेने जगभरातील सायबर गुन्ह्यांचे आणि सायबर हल्ल्यांचा सर्व्हे केला आहे. एफ-सेक्युअर संस्थेने सादर केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अमेरिका, रशिया, चीन आणि नेदरलँड या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत. यातही रशियामधून भारतावर सर्वाधिक (२,५५,५८९) सायबर हल्ले करण्यात आले असल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ अमेरीका (१,०३,४५८), चीन (४२,५४४), नेदरलँड (१९,१६९) आणि जर्मनी (15,३३०) या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत.

भारतामधून देखील इतर देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतामधून ऑस्ट्रिया (१२,५४०), नेदरलँड (९,२६७), ब्रिटन (६३४७), जपान (४,७०१ ) आणि युक्रेन (३,७०८) या देशांवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

Aprna

“जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी IRSची नोकरी मिळवली” ?

News Desk

झरेवाडीच्या रंगीला बाबा अखेर अटकेत

News Desk
राजकारण

महाआघाडीमध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचा समावेश

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. अखेर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या महाआघाडीमध्ये तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूचंद्रबाबू नायडू यांचा समावेश झाला आहे.

राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोघांमधील भेट झाली असल्याचे अंदाज व्यक्त केला जात होताच. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी आता ते एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.

Related posts

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk