HW News Marathi
क्राइम

पत्नीच्या हत्येच्या आरोपातून शोएबची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली । ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या शोचा फेम शोएब इलियासीची पत्नीच्या हत्येच्या आरोपातून आज दिल्ली कोर्टाने निर्दोष अशी मुक्तता केली. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्याखाली शोएबला अटक करण्यात आली. १७ वर्षांनंतर दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने शोएबला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज (५ ऑक्टोबर) शोएबची दिल्ली हायकोर्टने निर्दोष मुक्तता केली. इंडियाज मोस्ट वॉन्टेड या शो ने ९०चा काळ गाजवला होता. अनेक गुन्हेगारांनीहि या शो ची दखल घेतली होती. ९०च्या काळात या शोमुळे शोएबलासुद्धा प्रसिद्धी मिळाली होती. अंजुच्या मृत्यूनंतर शोएबने सौम्या खान हिच्याशी लग्न केले त्यांना एक मुलगा आहे.
शोएबच्या जीवनावर आढावा
शोएबचा जन्म दिल्लीमध्ये झाला असून त्याचे वडील पिता जमील इलियासी ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख होते. शोएबने जामिया मिल्लिया इस्लामियामधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. तिथेच अंजुची आणि शोएबची ओळख झाली. शिक्षणानंतर अंजू व शोएब दोघेजण लंडन ला गेले. टीव्ही एशियामध्ये त्यांनी एकत्र काम केले. शोएब तिथे प्रोड्युसर म्हणून काम करत होता.भारतात परत आल्यावर त्यांनी इंडियाज मोस्ट वॉन्टेड या शोमध्ये त्याने अँकरचे काम केले. हा शो फरार अपराध्यांवर आधारित होता. या शो मध्ये क्राईमचे चित्रीकरण केले. त्यामुळे पोलिसांची मदत घेऊन संपूर्ण माहिती मिळवायचे.
या शो नंतर त्यांनी ४९८ए या नावाने चित्रपट तयार केला असून चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला. ११ जानेवारी २००० रोजी सकाळी शोएबच्या पत्नीची हत्या करण्यात आली. आणि हत्या करताना कात्रीचा वापर केल्याचा पुरावा सापडला. २८ मार्च २००० रोजी शोएबला अटक करण्यात आले. शोएब अंजूकडे वारंवार हुंड्याची मागणी करत असायचा व त्यामुळे त्यांच्यात दर रोज भांडण होत राहायचे, असा आरोप अंजुच्या कुटुंबीयांनी लावला. व त्यांनतर शोएबने लगेच सौम्या खानशी लग्न केले त्यांना एक मुलगा आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एकवीरा देवीचा सव्वा लाखाचा कळस चोरीला

News Desk

उमरीमध्ये 9 लाखाच्या गुटख्यासह दोघांना केले अटक 

News Desk

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

Aprna
देश / विदेश

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, जीवितहानी नाही

Gauri Tilekar

बागपत | भारतीय हवाई दलाच्या एका विमानाचा अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे मायक्रोलाईट एअरक्राफ्ट हे विमान आज (शुक्रवारी) उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका शेतजमिनीमध्ये कोसळले आहे. या विमानातील दोन्हीही वैमानिक सुदैवाने सुखरूपपणे बचावले आहेत. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मिळत आहे.

गाजियाबाद येथील हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या मायक्रोलाईट एअरक्राफ्ट या विमानाने उड्डाण केले होते. या विमानाचा नियमित देखरेखीसाठी वापर केला जातो. या विमानात दोन २ वैमानिकांसह ३ लोक होते. मात्र, उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात या विमानाचा अपघात झाला आहे.

हवाई दलाच्या या विमानाच्या दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत पॅराशूटचा वापर करत आपला जीव वाचविला आहे. ज्यावेळी हे विमान शेतजमिनीत कोसळले; त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात या विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

हवाई दलाचे मिग–२१ विमान हिमाचल प्रदेशमध्ये कोसळले

 

 

Related posts

जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली ! शरद पवारांच्या ‘त्या’ भर पावसातील सभेची वर्षपूर्ती

News Desk

#JantaCurfew : टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही, राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

swarit

मराठमोळ्या निला विखे-पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान सल्लागार पदी निवड

News Desk