HW News Marathi
क्राइम

२५ विद्यार्थ्यांची हजामत, शिक्षकांवर गुन्हा

मुंबई- मुंबई-विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे पालन केले नाही, यासाठी शिक्षा म्हणून त्यांचे केस जबरदस्तीने कापण्यात आल्याची घटना विक्रोळी येथे उघडकीस आली. एक शिक्षक आणि शाळा संचालकाने २५ विद्यार्थ्यांचे केस जबरदस्तीने कापल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षक, संचालकासहीत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली, ज्यानंतर आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली. शाळेतर्फे इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना छोटे केस ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू असताना यातील २५ विद्यार्थ्यांचे केस मोठे असल्याचे आढळले. यावेळी शिक्षक आणि संचालकांनी या विद्यार्थ्यांना केस छोटे न केल्यानं शिक्षा केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शाळा संचालक गणेश बाटा, शिक्षक मिलिंद जानके आणि कार्यालय सहाय्यक तुषार गोरे यांनी नियमांचे पालन न करणा-या विद्यार्थ्यांनी धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिघांनी २५ विद्यार्थ्यांचे कथित स्वरुपात केस जबरदस्तीने कापल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान दोन विद्यार्थी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर हनचटे यांनी सांगितले की आम्ही तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात दहिसर पोलिसात लेखी तक्रार दाखल

Aprna

चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

News Desk

मेजर गोगोई हॉटेल प्रकरणात दोषी, न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

swarit
क्राइम

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी महिला कर्मचऱ्यास पोलीस कोठडी, पाच अटकेत

News Desk

मुंबई मंजूळा हत्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने भायखळा तुरूंगातील पोलिस अधिकाऱ्यांसह पाच जणांना अटक केली आहे. मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मंजुळावर जेलमध्ये अन्याय करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. यातील बिंदू नायकवडे या पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली. २३ जून रोजी सकाळी तिने दोन अंडी व पाच पाव कमी मिळाल्याची तक्रार तुरुंग प्रशासनाकडे केली. त्यानंतर तिला पोलिसांनी मारहाण केली. केवळ या एका घटनेमुळे तिला प्राण गमवावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला फाॅलो करा https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/

Related posts

एकवीरा देवीचा सव्वा लाखाचा कळस चोरीला

News Desk

किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ

News Desk

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

News Desk