HW News Marathi
मनोरंजन

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

‘तारिणी’ या नौकेतून २५० दिवसाची जगभ्रमंती करण्याची कर्तबगारी बजावणाऱ्या नौदलाच्या सहा महिला अधिकारी यंदा केली. या सागरी परिक्रमेबरोबरच त्या समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करणाऱ्या पहिल्याच आशियाई महिला ठरल्या आहेत.

लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता आदी नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांचा या चमूत समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या सहा महिला नौदल अधिकारी समुद्री मार्गे जगभ्रमंतीला निघाल्या होत्या. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सहा जणींनी तयारी केली होती. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर होते. त्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकाऱ्यांनी २१ हजार ६०० सागरी मैल अंतर पार केले. या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव देण्यात आले होते.

यापूर्वी कमांडर दिलीप दोंदे यांनी भारताची पहिली विश्व सागरपरिक्रमा आयएनएसव्ही ‘म्हादेई’ या शिडाच्या नौकेच्या साह्याने केली. नंतर त्याच नौकेवर स्वार होत लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी याने विनाथांबा सागरपरिक्रमा केली. आता तिसरी विश्व सागरपरिक्रमा ही महिला चमूची पार पडली असून त्यासाठी आयएनएसव्ही तारिणी ही नवी शिडाची नौका बांधण्यात आली होती. ५६ फूट लांबीच्या या नौकेत आणखी काही अद्ययावत बदल करण्यात आले होते.

या प्रवासादरम्यान या महिलांनी चार ठिकाणी थांबे घेतले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ५५ फूट लांबीच्या या बोटीतून प्रवास करताना या सागरीकन्यांनी समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा अनुभव घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

९ डिसेंबरला विक्रांत सरंजामेचा ‘प्रपोज डे’? 

News Desk

“शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळविलं, भीक मागून नाही!”, राऊतांचा कंगना-गोखलेंना टोला

News Desk

मोझॅकच्या माध्यमातून चिमुकल्यांना अनोखी भेट

News Desk
राजकारण

‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील !

News Desk

सांगली | “देशातील सर्वसामान्यांच्या खात्यात हळूहळू १५ लाख रुपये जमा होतील”, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. “इतकी मोठी रक्कम सध्या सरकारकडे नाही. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे यासाठीच्या रकमेची मागणी करत आहोत मात्र रिझर्व्ह बँकेचा याला नकार आहे. त्यामुळे ही रक्कम नागरिकांच्या खात्यात एकाच वेळी जमा होऊ शकत नाहीत. मात्र, हळूहळू ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होतील”, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहेत.

दरम्यान, परदेशी बँकांमध्ये भारतीयांच्या काळ्या पैशाचे प्रमाण खूप जास्त आहे. आम्ही सत्तेत आलो तर हा सर्व काळा पैसे भारतात आणू. हा काळा पैसा जर भारतात आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वारंवार दिले होते. हे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे १५ लाख नागरिकांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार, असा प्रश्न मोदी सरकारला विचारला जात आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी आता ही रक्कम लवकरच नागरिकांच्या खात्यात जमा होणार असल्याचे म्हटले आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : गोव्यात शिवसेना-भाजपची युती नाही !

News Desk

शेगावत होणाऱ्या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे हजेरी लावणार?

Aprna

‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’

News Desk