HW News Marathi
राजकारण

‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील !

सांगली | “देशातील सर्वसामान्यांच्या खात्यात हळूहळू १५ लाख रुपये जमा होतील”, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. “इतकी मोठी रक्कम सध्या सरकारकडे नाही. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे यासाठीच्या रकमेची मागणी करत आहोत मात्र रिझर्व्ह बँकेचा याला नकार आहे. त्यामुळे ही रक्कम नागरिकांच्या खात्यात एकाच वेळी जमा होऊ शकत नाहीत. मात्र, हळूहळू ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होतील”, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहेत.

दरम्यान, परदेशी बँकांमध्ये भारतीयांच्या काळ्या पैशाचे प्रमाण खूप जास्त आहे. आम्ही सत्तेत आलो तर हा सर्व काळा पैसे भारतात आणू. हा काळा पैसा जर भारतात आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वारंवार दिले होते. हे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे १५ लाख नागरिकांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार, असा प्रश्न मोदी सरकारला विचारला जात आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी आता ही रक्कम लवकरच नागरिकांच्या खात्यात जमा होणार असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

News Desk

बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Aprna

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये ‘ब्लास्ट’

News Desk