HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | राजपथावर असा साजरा होतो भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही संबोधले जाते. २६ जानेवारी १९५० सालापासून भारतीय संविधान अंमलात आणण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, या स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला होता.

राजधानी दिल्लीत २६ जानेवारी रोजी एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिल ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनापूर्वी भारताचे पंतप्रधान अनाम सैनिकांसाठी बनविलेल्या अमर जवान ज्योती या स्मारकाकडे पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्यानंतर पंतप्रधानांचे तर राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुण्यांसोबत राजपथाच्या मुख्य मंचावर आगमन होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात त्यावेळी २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओवेसींसमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी

swarit

युट्यूब बंद पडते तेव्हा

swarit

भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

News Desk