HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | जाणून घ्या…“ऐ मेरे वतन के लोगो…” या हृदयस्पर्शी गीताचा इतिहास

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतापुढे सर्वात महत्त्वाचे आव्हान होते ते देशाच्या संरक्षणाचे ! भारतीय सीमांवर रात्रंदिवस पहारा देत, युद्धांमध्ये आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्या देशाचे, देशातील लोकांचे संरक्षण करणारे भारतीय जवान ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. या जवानांच्या शौर्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. जेव्हा जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचा उल्लेख होतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या सर्वानांच एका अत्यंत हृदयस्पर्शी गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

“ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी”

कवी प्रदीप यांनी “ऐ मेरे वतन के लोगो” हे गीत रचले आहे तर सी. रामचंद्र यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. हे गीत १९६२ मध्ये भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केले होते. जवानांच्या बलिदानाने प्रेरित होऊन कवी प्रदीप यांनी हे गाणे रचले.जेव्हा प्रदीप यांनी लतादीदींपुढे हे गाणे गाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, लतादीदींनी सुरुवातीला त्यास नकार दिला. कारण लतादीदींना या गाण्याचा सराव करण्यासाठी वेळ नव्हता. मात्र, त्यानंतर प्रदीप यांच्या आग्रहास्तव लतादीदींनी हे गाणे गाण्यास होकार दिला.

लतादीदींनी या गाण्याचा रियाज सुरु केला. लतादीदींनी इच्छा होती कि हे गाणे लता आणि आशा यांनी दोघींनीही एकत्र (ड्युएट) गाऊन सादर करावे. त्या दोघींनीही रियाज देखील केला होता. मात्र, ज्या दिवशी त्यांना दिल्लीला जायचे होते त्याच्या एक दिवसापूर्वी आशा यांनी काही कारणास्तव दिल्लीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे लतादीदींना एकटीलाच जावे लागले.

अखेर दिल्लीच्या रामलीला मैदानात भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी १९६३ साली पहिल्यांदा लता मंगेशकर यांनी हे गाणे सर्वांसमोर सादर केले. या कार्यक्रमासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु देखील उपस्थित राहिले होते. यावेळी, लतादीदींच्या आवाजातील “ऐ मेरे वतन के लोगो” हे गाणे ऐकून चक्क पंडित जवाहरलाल नेहरुंच्या डोळ्यांत अश्रू आले होते. या गाण्याने त्यावेळी उपस्थित प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रातलं सरकार पाडायची हिंमत कोणाच्याही बापात नाहीये!

Arati More

आरजे मलिष्कावर भारतीय भडकले! नेमकं काय झालं?

News Desk

दुचकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केले गुजरातच्या बसवर हल्ला

News Desk