HW News Marathi
मनोरंजन

… म्हणून साजरी करतात ‘नरक चतुर्दशी’

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही, असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.

नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला.

नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते.

सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असे मानले जाते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आचार्य अत्रे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

News Desk

अखेर मुंबई पोलिसांनी सलमान खानला शस्त परवाना केला जारी

Aprna

‘पियानो फॉर सेल’चा ग्रँड प्रीमियर सोहळा संपन्न

News Desk
राजकारण

निवडणूक येताच सेना-भाजप श्रीरामच्या भूमिकेत दिसतात !

Gauri Tilekar

औरंगाबाद |निवडणूक येताच शिवसेना आणि भाजप श्री रामच्या भूमिकेत दिसतात. हाती सत्ता असताना सहाशे कोटी रुपयांची कार्यलये बांधली जातात. मात्र आम्हला या गोष्टींपेक्षा त्या दुष्काळग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या ,नागरिकांची तसेच गरीबीला सामोरे जाणाऱ्यांची काळजी वाटते, अशा शब्दात राष्ट्रावादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी सेना-भाजपवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत चर्चा करताना त्या म्हणाल्या की, सर्वांना नको ता वाद घालण्यापेक्षा नको त्या चर्चा करण्यापेक्षा गरिबांना सवलती शेतकऱ्यांना योग्य त्या योजना मिळतील. शैक्षणिक शुल्क माफ करण्यासोबत शेतकऱयांना कर्ज माफ करावेत असे मत सुप्रिया यांनी व्यक्त केले आहे.

तसेच सुप्रिया यांनी सध्या सुरू असेलेल्या मीटु मोहिमे संबंधित देखली बोलताना म्हटल्या की, महिलांवर लैगिंक शोषणा झालेल्या यांनी निर्भिडपपणे समोर येऊन त्यांच्यावरील अत्याचाराचे कथन करावे. परंतु या मोहिमेतील प्रत्येक महिला खरच-बोलत असे नाही, काही महिला खोटे बोलू शकतात. तसेच विशाखा समिती महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. परंतु तिची अंमलबजावणी आपल्याकडे योग्य रित्या होत नाही. आमची सत्ता असतांना आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालय आणि शाळांमध्ये तक्रार समिती सुरु केली होती. जी या सरकारने सत्तेत येताच बंद केली. मी टू चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ती केवळ बातम्यांपूर्ती किंवा काही दिवसांपूर्ती मर्यादित राहता कामा नये, असे म्हणाल्या आहेत.

Related posts

दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सोमय्यांवर भडकल्या

News Desk

“सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनामी करण्याचा राणेंचा प्रयत्न,” केसरकरांचा गंभीर आरोप

Aprna