HW News Marathi
शिक्षण

पाच हजार शिक्षक कोर्टात जाणार

मुंबई प्रथमिक शिकक्षकांच्या बदल्या सुधारित धोरणानुसार या वर्षापासून सुरूवात होणार आहे.सुधारित धोरणानुसार बदल्यांना महाराष्ट्रातील शिक्षकांचा विरोध होत आहे. या धोरणाविरोधात पाच हजार शिक्षक कोर्टात धाव घेणार आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी बदल्यांचे नवे धोरण लागू केले असून त्याची अंमलबजावणी ३१ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे आपल्या गावाजवळच्या शाळेत शिकवत असलेल्या शिक्षकांची मोठी पंचाईत होणार आहे. बदलीच्या नव्या धोरणात शाळांची विभागणी अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात करण्यात येत आहे.

अवघड क्षेत्रातील शाळांत तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण शाळांमध्ये बदलीची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण भागातील शिक्षकांना धडकी भरली आहे. त्यात या बदल्या पूर्णपणे आॅनलाइन पद्धतीने होत असल्याने वशिलेबाज शिक्षकांना कुठलाही पर्याय राहिलेला नाही. शिक्षकांच्या बदल्या वशिल्याने व शिक्षक संघटना यांचा हस्तक्षेप असतो, अशी ओरड असायची. आता सर्वसाधारण व अवघड क्षेत्रे ठरवण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण शाळांत दहा वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात जाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

News Desk

महापुरुषांना विशिष्ठ जातीत बंदिस्त करू नये –  डॉ. कोत्तापल्ले  

News Desk

कायद्याच्या अंमलबजावणीला घरातून सुरुवात करा

News Desk
महाराष्ट्र

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk

ठाकरे कुटुंबाचा टायगर तर आमचा पँथर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे नेतृत्व भारतीय दलित पँथर या आक्रमक संघटनेतून उदयास आल्याने पँथर संघटनेवर त्यांचे अतूट प्रेम राहिले आहे त्यामुळे आज वन्य जीव दिनानिमित्त पँथर अर्थात बिबट्या वाघाला दत्तक घेतले

एका पँथर ने पँथर ला दत्तक घेण्याचा सोहळा पहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राणी प्रेमी आणि पँथर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती . ठाकरे कुटुंबाने सुद्धा यापूर्वीच टायगर दत्तक घेतला आहे त्याप्रमाणे आठवले कुटुंबाने पँथर दत्तक घेतला आहे

शिवसेनेचा टायगर आणि आरपीआय चा पँथर राजकीय जंगलात एकत्र आल्यावर संपूर्ण जंगलवर राज्यस्थापन करू शकतो याची प्रचिती शिवशक्ति भीमशक्ति च्या महायुतीतून मागे आम्ही दाखवून दिले आहे असे प्रतिपादन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .

ना रामदास आठवले यांचे सुपुत्र कु जीत आठवले यांच्या पुढाकारातून हा बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात आला . या पँथर चे नाव ” भीम ” असे ठेवण्यात आले आहे . या पँथर च्या वर्ष भराचा देखभाल खर्च 1लाख 20हजाराचा धनादेश दहिसर तालुका रिपाइं तर्फे देण्यात आला आहे .

तथागत बुद्धांनी मनवाने मानवावर प्रेम केले पाहिजे तसेच प्राणिमात्रांवरही प्रेम केले पाहिजे असा उपदेश केला आहे त्यानुसार बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात येणार आहे हा पँथर शहापुर येथे एका नदित जख्मी अवस्थेत सापडला होता त्याची देखभाल आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले .

पूर्वी शिवसेनेच्या टायगर चे आणि दलित पँथर चे जमत नव्हते मोठा संघर्ष होत होता आता मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठाकरे कुटुंबाने घेतलेला टायगर आणि आम्ही घेतलेला पँथर एकत्र राहतील असेही ना आठवले म्हणाले . यावेळी सौ सीमाताई आठवले आणि कु जीत आठवले उपस्थित होते .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती निमित्त अन्य कार्यक्रम करणे टाळून दहिसर रिपाइं तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हले यांनी वन्यजीव दिनानिमित्त हा उपक्रम राबविला .

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे पक्षावर नाराज?

News Desk

आमदार भारत भालके यांच्या निधनाने समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता गमावला – बाळासाहेब थोरात

News Desk

काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Aprna