HW News Marathi
शिक्षण

पाच हजार शिक्षक कोर्टात जाणार

मुंबई प्रथमिक शिकक्षकांच्या बदल्या सुधारित धोरणानुसार या वर्षापासून सुरूवात होणार आहे.सुधारित धोरणानुसार बदल्यांना महाराष्ट्रातील शिक्षकांचा विरोध होत आहे. या धोरणाविरोधात पाच हजार शिक्षक कोर्टात धाव घेणार आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी बदल्यांचे नवे धोरण लागू केले असून त्याची अंमलबजावणी ३१ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे आपल्या गावाजवळच्या शाळेत शिकवत असलेल्या शिक्षकांची मोठी पंचाईत होणार आहे. बदलीच्या नव्या धोरणात शाळांची विभागणी अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात करण्यात येत आहे.

अवघड क्षेत्रातील शाळांत तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण शाळांमध्ये बदलीची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण भागातील शिक्षकांना धडकी भरली आहे. त्यात या बदल्या पूर्णपणे आॅनलाइन पद्धतीने होत असल्याने वशिलेबाज शिक्षकांना कुठलाही पर्याय राहिलेला नाही. शिक्षकांच्या बदल्या वशिल्याने व शिक्षक संघटना यांचा हस्तक्षेप असतो, अशी ओरड असायची. आता सर्वसाधारण व अवघड क्षेत्रे ठरवण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण शाळांत दहा वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात जाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत एमपीएससी टॉपर्सचे ५ जुलै रोजी मार्गदर्शन 

News Desk

अनुदान, बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी अर्ज करा

News Desk

तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा !

News Desk