HW News Marathi
शिक्षण

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, ३५ हजार विद्यार्थी नापास

मुंबई | मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन प्रक्रियावरून वाद निर्माण झाला आहे. कारण गतवर्षाच्या परीक्षेच्या निकालात ९७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज दिले होते. त्यापैकी फक्त ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी चुकून नापास केल्याची कामगिरी मुंबई विद्यापीठाने केले असल्याची माहिती अधिकारात समोर आली आहे.

२०१४ ते २०१६ या तीन वर्षात विद्यापीठाच्या परीक्षेत सुमारे ७३ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होत्या. या मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरून प्रश्न उपस्थित होते आहेत. गतवर्षीच्या उन्हाळ्याच्या परीक्षेत ४९,५९६ विद्यार्थ्यांनी आपल्या ८५,०६८ उत्तरपत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर शंक उपस्थित करत रिचेकिंगसाठी अर्ज केला होता. यामध्ये १६,७३९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होता.

गेल्या वर्षी समर सेशन परीक्षेदरम्यान ४९ हजार ५९६ विद्यार्थ्यांना ८५ हजार ०६८ उत्तर पत्रिकांच्या तपासणीवर साशंकता होती. तेव्हा त्यांनी त्या उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनाला पाठवल्या होत्या. त्यात १६ हजार ७३९ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले.

२०१७च्या दुस-या सत्रातही जवळपास ४७,७१७ विद्यार्थ्यांनी ७६,०८६ उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. ज्यात १८,२५४ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. अशाच प्रकारे २०१६ च्या पहिल्या सत्रातही ४४,४४१ मधील जवळपास १६,९३४ विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळेच मुंबई विद्यापीठातीलपरीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होत असल्याचं आरटीआय कार्यकर्ता विहार दुर्वेने सांगितले आहे. २०१४ मध्येही जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, आता तो आकडा लाखांच्या जवळपास गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

अनुदान, बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी अर्ज करा

News Desk

पुणे येथे १८ एप्रिल रोजी साक्षर भारत प्रेरकांचे राज्यव्यापी भव्य धरणे आंदोलन

News Desk
राजकारण

कन्हैया कुमार यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Gauri Tilekar

बेगसुराई | जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या विरोधात बिहारमधील बेगुसराई येथे बजरंग दलाकडून हत्येचा प्रयत्न आणि हिंसाचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवानपूर येथील पोलिस ठाण्यात बजरंग दलाचे संयोजक शुभम भारद्वाज यांनी आयपीसी कलम ३०७ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हैया आणि बजरंग दल समर्थकांमध्ये काल (मंगळवार) रात्री मोठा वाद झाला होता.

भगवानपूरच्या दहिया गावाजवळ कन्हैया कुमार आपली सभा संपवून समर्थकांसह आले असताना तेथे बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि त्यांच्यात मोठी हाणामारी झाली होती. कन्हैया कुमार आणि बजरंग दलाच्या समर्थकांमध्ये झालेल्या या वादादरम्यान कन्हैया कुमार यांच्या समर्थकांकडून बजरंग दलाचा कार्यकर्ता सानू यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यात सानूच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती.

या हाणामारीदरम्यान बजरंग दलाचे काही कार्यकर्ते जखमी असून कन्हैया कुमारच्या ताफ्यातील काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिहारमधील बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून कन्हैया कुमार २०१९मध्ये आपली पहिली लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कन्हैय्या कुमार हे काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीचा उमेदवार असू शकतात. बिहारमधील बेगुलसराय या लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व लक्षणीय आहे.

Related posts

स्मार्ट सिटीच्या नावाखाली मनसेने केलेलीच कामे भाजपने आम्ही केली असे दाखवले !

News Desk

भाजपकडून १७ राज्यांसह १ केंद्रशासित प्रदेशाच्या प्रभारींची नावे जाहीर

News Desk

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली !

News Desk