HW News Marathi
शिक्षण

अकरावी प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई | अकरावीच्या प्रवेशाची चौथी यादी ७ ऑगस्टला जाहीर झाली, मात्र ७ ऑगस्टपासून तीन दिवस पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मुंबई आणि ठाण्यातील ज्युनिअर कॉलेजांतील बहुतांश शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्यानं या प्रवेश घेताना अनेक अडचणीना सामोर जाव लागत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागान चौथ्या फेरीतील प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी आयोजित करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी आणि शिक्षण विभागाकडून होणारा त्रास वाचवण्यासाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीनेही तीन दिवसांचा संप पुकारला आहे. यामुळे बुधवारी अनेक शाळा व कॉलेजे बंद राहिली. बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅड टीचर्स युनियन (बुक्टू) या कॉलेज प्राध्यापक संघटनेनेही संपाला पाठिंबा दर्शविला आहे. याचा थेट परिणाम कॉलेजांतील कामकाजावर दिसून आला. अकरावीची चौथी यादी मंगळवारी ७ ऑगस्टला जाहीर झाली असून या यादीत मुंबई विभागातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर बुधवारी बहुतांश विद्यार्थ्यांनी कॉलेज गाठले. मात्र तेथे कामकाज बंद असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यात काही नामांकित कॉलेजांचाही समावेश आहे. त्याशिवाय गुरुवारी ९ ऑगस्ट मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून मूदत वाढ मिळावी अशी मागणी होत होती. यानुसार रात्री उशीरा शालेय शिक्षण विभागाने एक दिवसांची मूदत वाढ देत १० तारखेपर्यंत प्रवेश घेण्याची मुभा विद्यर्थ्यना दिली आहे.

विशेष फेरीचे आयोजन –

अकरावी प्रवेशाच्या आत्तापर्यंत चार फेऱ्या झाल्या. मात्र त्यानंतरही सुमारे ३२ हजार १ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच या फेरीतीलही अनेक विद्यार्थी प्रवेश रद्द करू शकतील किंवा घेणार नाहीत. अशा प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी जाहीर केले. या विशेष फेरीपूर्वी अल्पसंख्याक कोट्यातील जागा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. याची प्रकिया गुरुवारी ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या विशेष फेरीतही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीत प्रवेश दिले जातील असेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील वेळापत्रक गुरुवारी अकरावी प्रवेशाच्या https://mumbai.11thadmission.net/ या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिडनेहॅम महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

विना अनुदानित दिव्यांग शाळांच्या शिक्षकांचे आमरण उपोषण

News Desk

पुणे येथे १८ एप्रिल रोजी साक्षर भारत प्रेरकांचे राज्यव्यापी भव्य धरणे आंदोलन

News Desk