HW News Marathi
शिक्षण

यशश्रीने गाठले यशशिखर

मुंबई| महाराष्ट्र राज्य शालांत परिक्षांचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. या निकालात राज्यात मुलींनी यंदा देखील बाजी मारली आहे. कुर्ला पश्चिम येथील महिला मंडळ शाळेतील विद्यार्थीनी यशश्री संतोष गायकवाड हिने देखील दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिला क्रमांक पटकावत शाळेच्या फळ्यावर आपले नाव कोरले आहे.

यशश्रीला ९४.२० टक्के गुण मिळाले आहेत. यशश्री अत्यंत हुशार विद्यार्थींनी आहे तसेच या परीक्षेसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. दिवस-रात्र अभ्यास करून ९४.२० टक्के गुण तीने मिळवले आहेत अशी प्रतिक्रिया तिच्या पालकांनी दिली. तसेच शाळेतील मुख्याध्यापिका यांनी देखील यशश्रीचे कौतुक केले.

महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. यावेळी त्या म्हणाल्या की ती वर्षभर मन लावून अभ्यास करत होती. तसेच ती इतर गोष्टीमध्ये देखील तत्पर असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी आवर्जून सांगितले. यावेळी शाळेत यशश्रीचे आई, वडील तिला मार्गदर्शन करणारा तिचा भाऊ उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“गडकिल्ले व पर्यावरण संवर्धन” कार्यक्रमाचे आयोजन

News Desk

ठाणे महानगरपालिकेत अधिष्ठाता पदाची जागा

News Desk

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk
राजकारण

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk

औरंगाबाद | शिवसेने मधील अंतर्गत वाद परत एकदा चव्हाट्यावर आला आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठविण्याची शपथ घेतली होती असे वक्तव्य आज औरंगाबाद येथे केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मला पाडण्याचे त्यांनी ठरवले होते. पण मी विरोधकांबरोबर स्वकीयांच्या विरोधात लढलो आणि जिंकून आलो असेही यावेळी बोलताना गीते म्हणाले.

औरंगाबादच्या शिवसेना शाखेच्या ३३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनंत गिते बोलत होते. यावेळ‌ी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

“…तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवते”, राऊतांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

Aprna

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर

News Desk

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk