HW News Marathi
शिक्षण

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

उत्तम बाबळे

नांदेड :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या पुराव्यासह सोमवार १० जुलै २०१७ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी आभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. सन २०१६ – १७ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने ८० टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुणक्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णाभाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.

अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी देण्यात यावीत. सोमवार १० जुलै नंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत,याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असेही आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk

प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी अभाविपचं धरणे आंदोलन

News Desk

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश बंद

News Desk
महाराष्ट्र

येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

News Desk

नागपूर | महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावासाचा जोर शनिवार आणि रविवारी देखील कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्या कडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शुक्रवारपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीला अडतळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याशिवाय काही भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला असून लोकांचे प्रचंड हाल देखील झाले. शुक्रवारी मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामाकाजालादेखील बसला. विधीमंडळाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने काल कामकाज होऊ शकले नाही.

आज हवामान खात्याने पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नागपूरच्या महापालिकेत भाजपाची सत्ता असताना नागपूरात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. विधीमंडळाचे कामकाज आणि नागपूरात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे आजच्या दैनिक सामनामध्ये देखील शिवसेना अध्यक्षांनी अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Related posts

पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी विक्रम कुमार नवे पालिका आयुक्त

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी साताऱ्याला रवाना

News Desk

“बेळगावमध्ये बऱ्याच वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु, आता इथं माकडांचं काम नाही”

News Desk