HW News Marathi
मनोरंजन

अमिताभ घोष ठरले यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

नवी दिल्ली | साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांना जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी (१४ डिसेंबर) झालेल्या ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यावेळी या बैठकीत ५४व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताभ घोष यांची निवड करण्यात आली.

अमिताभ घोष यांना इंग्रजी साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याआधी शॅडो लाइन्स या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याचबरोबर, केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

अमिताभ घोष यांचा ११ जुलै १९५६ रोजी कोलकाता येथे जन्म झाला. दिल्लीच्या सेंट स्टीफन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांमधून घोष यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. ‘द सर्कल ऑफ रीजन’ ही त्यांची पहिली कांदबरी होती. या कादंबरीने अमिताभ घोष यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरूणाईच्‍या प्रचंड उत्‍साहात अटल महोत्‍सवाची सांगता

News Desk

सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

swarit

एसटीएफने ऊधळला सलमानच्या हत्येचा कट

News Desk