HW News Marathi
मनोरंजन

मराठी बिग बॉसमध्ये अजून एक वाईल्ड कार्ड एण्ट्री

मुंबई | दिवसेंदिवस कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये अजून रंगत वाढणार आहे. नुकतेच अभिनेता राजेश शृंगारपुरे बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे. तर रितुजाच्या हाताला गांभीर दुखापत झाल्यामुळे तिला मध्येच सोडून बाहेर जावे लागले.

आता बिग बॉसच्या घरात आणखी एक सदस्यची एण्ट्री होणार आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरात येणार असल्याची चर्चा असून तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्याच आठवड्यात अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही सुद्धा वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात आली आहे. त्यानंतर आता अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचीही तशीच एण्ट्री होणार आहे. शर्मिष्ठाच्या येण्याने बिग बॉस मध्ये काय काय घडामोडी घडतील. याकडे सर्व रसिक प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या… टाकाऊपासून टिकाऊ कंदील कसे बनवायचे

swarit

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

News Desk

बाॅलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

News Desk
राजकारण

दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करा

News Desk

मुंबई | गुजरातच्या राजकोट येथे काचपत्रा वेचणाऱ्या दलित तरुणाची चोरीच्या संशयावरून हत्या करण्यात आली. या अमानुषतेचा आपण रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असून दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फासावर लटकवावे असे मत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते ठाण्यातील श्रीनगर च्या वारलीपाड्यात रिपाइंच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात बोलत होते.

यावेळी रिपाइं चे ठाणे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे; डी एम चव्हाण; भास्कर वाघमारे; साहेबराव सुरवाडे ; आबासाहेब चासकर ; मानीषाताई करलाद सचीन भतंब्रेकर; हेमंत रणपिसे गणेश शरणागत ; ऍड. नितीन सरोदे; सुरेश मोरे; कृष्णा कोळे; राजेश मोरे; राजेश सोनवणे ; विक्रम पोटभरे; किशोर आठवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजकोट येथील मुकेश वनिया या 30 वर्षांच्या दलित तरुणाची अमानुष मारहाण करून करण्यात आलेली हत्या हा मानवतेला कलंक फासणारा प्रकार आहे . या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही घटना घडल्याची महिती मिळताच याप्रकरणी राजकोट च्या पोलीस अधिकाऱ्यांशी आपण त्वरित संपर्क साधून आरोपिंना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या प्रकरणी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार असून दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा करावी अशी मागणी करणार असल्याचे यावेळी रामदास आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचे येत्या दि 27 मे रोजी पुण्यातील आर टी ओ जवळील ;एस एस पी एम एस मैदानात राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या भव्य अधिवेशनास ठाणे जिल्हा रिपाइं च्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ना रामदास आठवलेंनी यावेळी केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्यांनी दिलेली लोकशाही श्रेष्ठ आहे. कर्नाटकात जे राजकीय युद्ध घडले त्यात कोणत्याही पक्षाचा विजय झाला नसून विजय झाला आहे तर तो केवळ या देशातील लोकशाही चा विजय झाला आहे असे प्रतिपादन रामदास आठवलेंनी केले.

 

Related posts

विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेेंयचा पराभव

Aprna

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk

हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते !

News Desk