HW News Marathi
मनोरंजन

‘झीरो’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई । अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘झीरो’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.अमृतपाल सिंग खालसा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने किरपान धारण केल्याने शीख समुदाय नाराज आहेत. ते आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

किंग खानचा ‘झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी(२ ऑक्टोबर) रिलीज झाला आहे. २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिल्लीमधील अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरपान हे शीख धर्मियांमध्ये पवित्र मानले जात असून शीख धर्मिय ते धारण करतात. मात्र,या पोस्टरमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखविल्या आहेत. अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाड्यात सापडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे !

News Desk

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

swarit
क्रीडा

नुसती विधाने करण्यापेक्षा तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | “नुसती विधाने करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या”, असे बीसीसीआयमधील प्रशसकीय समितीने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सुनावले आहे. “भारतीय क्रिकेट संघ गेल्या पंधरा वर्षांमधील सर्वोत्तम संघ असेल”, असे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शास्त्री यांनी म्हटले होते. शास्त्री यांच्या या विधानावर सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी सडकून टीका केली होती.

दरम्यान, भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर संघाच्या माजी कर्णधारांकडून रवी शास्त्रींवर टीका मोठी टीका झाली. आता खुद्द बीसीसीआयनेच रवी शास्त्री यांना सुनावले आहे. “आता ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी कशी चांगली होईल. याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे,” असेही बीसीसीआयने रवी शास्त्री यांना उद्देशून म्हटले आहे.

Related posts

सचिन तेंडुलकरने केली धोनीची पाठराखण

swarit

आजपासून महिला हॉकी वर्ल्डकपला सुरुवात

News Desk

Mumbai Marathon 2019 | मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी

News Desk