HW News Marathi
मनोरंजन

राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणे महत्वाचे | नाना पाटेकर

पुणे | देशभरात राममंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना अभिनेते नाना पाटेकर यांनीही राम मंदिराबाबत भाष्य केले आहे. “राममंदिराच्या निर्मितीपेक्षा गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखे वाटेल. त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधायचे असेल तर बांधा पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे,” असे मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे.

राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. तसेच खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्यासाठी नाम फाऊंडेशनकडून ५ पोकलनची मदत या उपक्रमासाठी देण्यात आली.

देशभरातील शेतकऱ्यांनी काढलेल्या किसान मोर्चावरही नाना पाटेकरांनी यावेळी भाष्य केले. “गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळी असे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण होत नसतील, म्हणून हे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. एकटे सरकारही सगळ्या गोष्टी पूर्ण करु शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा” असे मत नानांनी व्यक्त केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चॉकलेट फज

News Desk

दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप

News Desk

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

News Desk
राजकारण

योगी आदित्यनाथ यांची ओवेसींना धमकी ?

News Desk

हैदराबाद | ‘मी तुम्हाला विश्वास देतो की, तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओवेसींनी निजामासारखे हैदराबाद सोडून पळावे लागेल,’ असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ ओवेसींवर बरसले.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या इशाऱ्याला मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे ( एआयएमआयएम) अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी प्रत्युत्तर देणार आहेत. ओवेसी यांनी त्यांच्या ट्विटरवरुन दिले आहे की, ‘संध्याकाळी ७ ते १० दरम्यान होणाऱ्या सभेतून योगींना उत्तर दिले जाईल,’ असे ट्विट ओवेसींनी केले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस आणि तेलुगू देसम (टीडीपी) हे दोन्ही खिसेकापणाऱ्यांच्या जमातीचे पक्ष असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे.

याआधी भाजपचे आमदार राजा सिंह यांनी ओवेसींबद्दल वादग्रस्त विधान केले होते की, ‘ओवेसींचे शीर धडावेगळे केल्यावरच मी संतुष्ट होईन,’ असे राजा सिंह यांनी म्हटले होते. याआधी असदुद्दीन ओवेसी यांनी सैदाबादमधील एका सभेत बोलताना भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. ‘मुस्लिमांची धार्मिक स्थळे, मदरसे बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असा आरोप ओवेसी यांनी केला होता. तेलंगणात ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर ११ डिसेंबरला मतमोजणी होईल.

 

 

Related posts

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची आता डिपॉजिट वाचविण्‍याचीच लढाई | आशिष शेलार

News Desk

उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय क्षमता आहे, हे सर्वांना माहित आहे | नितेश राणे

News Desk