HW News Marathi
मनोरंजन

राज ठाकरेंकडून नाना पाटेकर यांची पाठराखण

अमरावती | अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या अभिनेते नाना पाटेकर वादाच्या भौ-यात सापडले आहेत. तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मात्र नाना पाटेकर महिलेशी गैरवर्तन करेल असे वाटत नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर कितीही खराब असला, तरीही महिलेसोबत गैरवर्तन करणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी नानांची पाठराखण केली आहे. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केले आहे.

नाना पाटेकर विचित्र गोष्टी करतो, याची मला कल्पना आहे. तो असभ्य माणूस आहे. मात्र असे असले तरीही तो महिलेशी गैरवर्तन करणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालय निकाल देईल. त्यामुळे आपण फक्त आरोपांवरुन कोणाला दोषी धरु नये, असे आवाहन देखील राज यांनी यावेळी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इतिहास महाराष्ट्र दिनाचा

swarit

‘तुला पाहते रे’ ला पुण्यातून विरोध

News Desk

भारतीय संघाचा दारुन पराभव २-०ने मालिका गमावली

swarit
राजकारण

राम मंदिरासाठी कायदा करा, सरसंघचालक भागवतांचे वक्तव्य

News Desk

नागपूर | दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजया दशमी उत्सव साजरा केला. स्वयंसेवकांनी पथसंचलन केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना भागवतांनी राम मंदिरसाठी कायदा करण्यात यावा असे वक्तव्य केले.

यावेळी मोहन भागवत म्हणाले,“रामजन्मभूमीवर लिहिलेलेही आहे की तिथे मंदिर होते. त्यामुळे मंदिर असल्याचे सिद्ध झाले आहे. पण काही लोक निर्णय प्रक्रियेत विलंब करत आहेत. हे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यामुळे सरकारने आवश्यक कायदा करुन राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा, असेही मोहन भागवत म्हणाले. शिवाय प्रभू राम हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे, असे यावेळी भागवतांनी आवर्जून नमूद केले.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

News Desk

नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम

Aprna

अजितदादा जेव्हा सिंहासन नाकारतात तेव्हा.

swarit