HW News Marathi
राजकारण

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

हैदराबाद | काँग्रेस आणि तेलुगू देसम (टीडीपी) हे दोन्ही खिसेकापणाऱ्यांच्या जमातीचे पक्ष असल्याची टीका मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे ( एआयएमआयएम) अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीकेची पातळी गाठली आहे. ओवेसी यांनी हैदराबाद येथील प्रचार सभेत काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षावर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जानव्यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, युवकांना जेलमध्ये टाकण्यात आले. तेव्हा राहुल कोठे होते, चंदबाबू नायडू यांच्यामुळे अनेक जीव बर्बाद झाले, तेव्हा काँग्रेस मदतीला आली का? जानवेधारी हिंदू आला का? काँग्रेस आणि तेलुगू देसमही (टीडीपी) खिसेकापणाऱ्यांच्या जमात आहे. आमचे दुःख काय आहे, तुम्हाला काय कळणार, अशा शब्दात ओवेसींनी निशाणा साधला. हे दोन्ही पक्ष एआयएमआयएमला रोखू शकत नाहीत. शेरवानी घालून सगळ्यांना त्रास देत असल्याने या सर्व पक्षांना मी खटकत असल्याचे देखील यावेळी ओवेसी म्हणाले आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेस-टीडीपी-सीपीआय आणि तेलंगणा जन समितीने प्रजाकुटमी म्हणजेच महाआघाडी केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) स्वबळावर मैदानात उतरली आहे. भाजपही स्वबळावर नशीब आजमावत आहे. तेलंगणामधील ११९ जागांसाठी सात डिसेंबरला मतदान होणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत टीआरएसने ९० जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला १३, एआयएमआयएमला ७, भाजपला ५ टीडीपीला ५, तर सीपीएमला १ जागा मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Aprna

लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Manasi Devkar

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

Aprna
राजकारण

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

News Desk

नवीदिल्ली | ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक आणि ऍट्रॉसिटी कायद्याला संरक्षण देणारे विधेयक संसदेत मंजूर करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचे क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

ऍट्रॉसीटी कायदा शिथिल करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तो निर्णय रद्द करणारे विधेयक लोकसभेने मंजूर करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशभरातील आंबेडकरी जनता या निर्णयाने समाधानी झाल्याचे सांगत रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक संसदेने मंजूर केल्याने ओबीसी समाजाने स्वागत केले आहे. या दोन्ही विधेयकांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार दलित बहिजनांच्या हितासाठी कार्यरत आहे आणि या समाज घटकांच्या हितासाठी आपण केंद्रसरकार मध्ये खंबीर असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

ऍट्रॉसीटी कायद्याचे संरक्षण करणारे विधेयक संसदेत मांडावे या साठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. असे रामदास आठवले यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक खोटे आरोप करीत असून दलित बहुजनांच्या हितासाठी मोदी सरकार कार्यरत असल्याचे ऍट्रॉसिटीच्या संरक्षणासाठी मंजूर केलेले विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतल्याने विरोधक उघडे पडले आहेत असे ना रामदास आठवले म्हणाले.

Related posts

मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे !

News Desk

गौतम गंभीर पुन्हा अडचणीत, परवानगीशिवायच घेतली प्रचारसभा

News Desk

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

News Desk