HW News Marathi
मनोरंजन

किंग खानने घेतली दिलीप कुमार यांची भेट

मुंबई : ज्येष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वीआयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांची तब्येत सुधारत असल्याचे पत्नी सायरा बानू यांनी मिडियाला सांगितले आहे. दरम्यान, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शाहरुख खान नुकताच त्यांच्या घरी गेला होता.

शाहरुख खान आणि दिलीप कुमार यांचे जवळचे नाते आहे. दिलीप कुमार शाहरुख खानला आपला मुलगा मानतात. सायरा बानूनेच दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांचे फोटो दिलीप कुमार यांच्या ट्विटर या सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत. ‘दिलीप साहाब घरी परतल्यापासून त्यांची तब्येत चांगलीच सुधारली आहे. त्यांचा मानलेला मुलगा शाहरुख खानने नुकतीच त्यांना घरी येऊन भेट दिली.त्याच्यातील काही फोटो मी शेअर केले आहेत’, अशा फोटोओळी बानो यांनी या फोटोला दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेता सैयद बदरुल हसन खान बहादुर यांचे निधन

News Desk

आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

Gauri Tilekar

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

swarit
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

३० डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांबद्दल जर कोणताही तोडगा निघाला नाही तर… शरद पवारांचा इशारा

News Desk

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेना खासदारांची दिल्लीत घोषणाबाजी

News Desk

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk