HW News Marathi
मनोरंजन

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

मुंबई – लातूरच्या जयश्री जाधव या कौन बनेगा करोडपतीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन साडेसहा लाख रुपये जिंकले आहेत. त्यांनी ११ प्रश्नांची योग्य उत्तरे दिले. परंतु 12 व्या प्रश्नावर त्या अडखळल्या आणि लाईफलाईन शिल्लक नसल्याने त्यांना हा खेळ सोडावा लागला. दरम्यान, जयश्री एका शाळेत शिक्षिका असून त्यांना या शाळेत आतापर्यंत पगार देण्यात आलेला नाही. कारण या शाळेला सरकारी अनुदान नाही. असे असताना त्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी दररोज 45 किमीचा प्रवास करतात. यासाठी दररोज त्यांना 105 रुपये खर्च करावे लागतात. परंतु संस्थाचालक एक रुपयाही त्यांना पगार देत नाही. केवळ शिक्षणाची आवड असल्याने त्या हे कार्य करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

News Desk

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk

टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार

News Desk