HW News Marathi
मनोरंजन

तनुश्री दत्ताला नानांनी बजावली कायदेशीर नोटीस

मुंबई | “मला काल २ कायदेशीर नोटीस मिळाल्या. त्यातली एक नोटीस नाना पाटेकर व दुसरे विवेक अग्निहोत्री यांनी पाठवली. शोषणा विरोधात आवाज उठवण्याची ही किंमत मला मोजावी लागत आहे. अश्या प्रकारे मला माझ्याच देशामध्ये अन्याय सहन करावा लागत आहे.” अश्या प्रकारची माहिती काल तनुश्रीने दिली. पुढे ती असेही म्हणाली,” काल दुपारच्यावेळी माझ्या सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस लंचब्रेकला गेले असताना. दोन अज्ञात व्यक्तींनी माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.”
मनसेनेही मला धमकी दिली. अश्या प्रकारे मला आता कोर्टात खेचले जात आहे. मी खर बोलल्याची किंमत मला मोजावी लागत आहे. अशा प्रकारे मला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा घटनांच्या बाबतीत कोर्टात फक्त तारखा दिल्या जातात . कोर्टामध्ये खोटे साक्षीदार उभे केले जातात.पीडित व्यक्तींना न्याय मिळवण्यासाठी झगडत राहावे लागते. अश्या प्रकारे पीडितांचे खच्चीकरणं होते आणि न्याय मिळण्याची आशा संपते. दहा वर्षाआधी देखील मला अश्याच प्रकारे संघर्ष करावा लागला होता. त्यामळे मी देशाबाहेर निघून गेली. आता परत आल्यानंतर ही मला सहन करावे लागत आहे. त्यामळे माझे नवे आयुष्यही खराब होईल.
तसेच तनुश्रीने नाना पाटेकरांसोबत चॉकलेट सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर देखील गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे. “चॉकलेट-डीप डार्क सिक्रेट” या सिनेमाच्या सेटवर विवेक अग्निहोत्रीयांनी ही गैरवर्तुणूक केल्याचे सांगितले. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने कोणतीही पूर्व कल्पना न देता मला संपूर्ण कपडे काडून डान्स करण्यास सांगितले. पण त्यावेळी सुनील शेट्टी व इरफान खान यांनी मला सांभाळून घेतले.असे ही तनुश्रीने सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

News Desk

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला ५ वर्षाची शिक्षा 

News Desk

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

News Desk

Aprna

Chetan Kirdat