HW News Marathi
मनोरंजन

मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने चित्रीत होणार मराठी चित्रपट

मुंबई | हल्ली चित्रपट निर्मितीसाठी हाय क्लॅरिटी कॅमेरे वापरले जातात. यामधून उत्तमरित्या चित्रीकरण केले जाते, परंतु सध्या पाहायला गेले तर आपल्याला अनेक ठिकाणी मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात दिसून येतो. लघुपट किंवा आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील अनेक जण सध्या मोजॉ किटचा वापर करतात.

या ट्रेंडमुळे महाराष्ट्रात अश्याच एका चित्रपटाचे मोबाईलवर संपूर्ण चित्रीकरण केले जाणार आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे असाच एक आगळा वेगळा चित्रपट घेऊन आपल्या सर्वांसमोर येत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांच्या प्रमुख भूमिका असल्याची माहीती मिळाली आहे.

परंतु मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने चित्रीत केलेला पहिला मराठी चित्रपट येऊ घातला आहे. पहिल्यांदाच असा प्रयोग होताना दिसणार आहे. नेहमीच काहीतरी वेगळा प्रयोग करणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर हा आगळावेगळा प्रयोग करणार आहेत. कुंडलकर नेहमीच पठडीबाहेरचे चित्रपट रसिकांसाठी आणतात. त्यांचा आगामी चित्रपटाबद्दल त्यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केले आहे.

काय आहे नक्की सचिन कुंडलकर यांची पोस्ट

‘पाँडिचेरी’

संपूर्णपणे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होत असलेली माझी पूर्ण लांबीची फिल्म. कामाच्या प्राथमिक तयारीला उत्साहाने सुरुवात ! ह्या प्रवासापासून ! ह्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटात सामील झालेल्या माझ्या दोन आवडत्या कलाकारांचे स्वागत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आयपीएल सट्टा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अरबाजची चौकशी

News Desk

welcome2019 : नवीन वर्षात तरुणांनी केले मुंबई पोलिसांचे कौतुक

News Desk

पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेची जय्यत तयारी

News Desk
महाराष्ट्र

सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटींची मदत | नितीन गडकरी

News Desk

नवी दिल्ली | राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रासाठी १ लाख १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा बुधवारी झाली आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, पावसाळा संपताच सिंचन प्रकल्पाला सुरुवात होईल. राज्यातील ९१ प्रकल्पांसाठी केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून सिंचन १८ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर जाणार आहे. तसेच या प्रकल्पात सातारा, सांगली आणि बुलढाण्यातील प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती गडकरीनी दिली. केंद्राच्या मदतीमुळे सिंचनक्षेत्र 40 टक्के वाढेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

Related posts

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ‘या’ खात्याची तात्पुरती जबाबदारी

News Desk

भीमा कोरेगाव येथे झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या निषेधार्थ बदलापुरात कडकडीत बंद

News Desk

गणेश नाईक आयत्या वेळी पक्ष सोडतील असे मी सांगितले होतेच !

News Desk