HW News Marathi
महाराष्ट्र

सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटींची मदत | नितीन गडकरी

नवी दिल्ली | राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रासाठी १ लाख १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा बुधवारी झाली आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, पावसाळा संपताच सिंचन प्रकल्पाला सुरुवात होईल. राज्यातील ९१ प्रकल्पांसाठी केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून सिंचन १८ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर जाणार आहे. तसेच या प्रकल्पात सातारा, सांगली आणि बुलढाण्यातील प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती गडकरीनी दिली. केंद्राच्या मदतीमुळे सिंचनक्षेत्र 40 टक्के वाढेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘म्हणूनच मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, आदित्य शिरोडकरांनी सांगितलं कारण

News Desk

‘ते’ कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो !

News Desk

बार्टी तर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास – धनंजय मुंडे

News Desk
मुंबई

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

News Desk

मुंबई | पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनजवळ असलेल्या पादचारी पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. हा पुल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला पहायला मिळत आहे. या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती सध्या समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास हा गोखले पूल कोसळला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी कार्यालयात जाणा-या चाकरमान्यांची घाई असते अशा वेळी हा पुल कोसळल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related posts

Live Updates | नरेंद्र मोदी मुंबई दौरा

News Desk

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच! विखे पाटील

News Desk

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

News Desk