HW News Marathi
महाराष्ट्र

सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटींची मदत | नितीन गडकरी

नवी दिल्ली | राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रासाठी १ लाख १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा बुधवारी झाली आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, पावसाळा संपताच सिंचन प्रकल्पाला सुरुवात होईल. राज्यातील ९१ प्रकल्पांसाठी केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून सिंचन १८ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर जाणार आहे. तसेच या प्रकल्पात सातारा, सांगली आणि बुलढाण्यातील प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती गडकरीनी दिली. केंद्राच्या मदतीमुळे सिंचनक्षेत्र 40 टक्के वाढेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘४५ हजार कृषी विद्यार्थ्यांना दिलासा,’ दादा भुसेंची महत्वाची माहिती!

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला, एसटी सेवा केली बंद

News Desk

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे खासदार उन्मेष पाटलांचे उल्लंघन

swarit
महाराष्ट्र

नगरसेवकांना प्रवासासाठी मिळणार हेलिकॉप्टर ? 

News Desk

पुणे | नगरसेवकांना प्रवासासाठी हेलिकॉप्टर मिळणार आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. असा ठराव महापालिकेत कसा मांडला गेला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ही सर्वसाधारण सभा असली तरी ती अभिरूप सभा आहे.महापालिकेच्या वर्धापन दिनाला दरवर्षी पालिकेत आयुक्तांसह प्रशासकीय अधिकारी महापौर नगरसेवकांच्या भूमिकेत असतात तर नगरसेवक हे महापौर, आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असतात. त्यामुळे महापालिकेत असे भन्नाट विषय मंजूर करण्यात येतात. त्यामुळे ही महापालिकेची अभिरूप सभा असल्यामुळे पिंपरीकरांना ताण घेण्याची गरज नाहीये.

 

Related posts

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडा वसतिगृह बांधून दिले जाणार

News Desk

इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेलाही पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन

News Desk

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

News Desk