HW News Marathi
मनोरंजन

राज ठाकरे यांची कन्या बॉलवूडमध्ये!

मुंबई : कुटुंबाचा राजकीय नव्हे, तर कलात्मक वारसा उचलत बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिने घेतला आहे.

आगामी जुडवा २या हिंदी चित्रपटातून उर्वशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. मात्र, उर्वशी चित्रपटात अभियन करतनाही. तर, ती या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. ‘राजकीय नेत्यांच्या मुलांचा एकंदर वावर जरा वेगळा असतो. पण, उर्वशीच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. ती खूप समंजस आहे. चित्रीकरणादरम्यान बराच काळ ती राज ठाकरे यांची मुलगी आहे, हे कुणाला ठाऊकही नव्हतं,’ असे या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन सांगितले. धवन पुढेम्हणाले, ‘तिला मी जेव्हा पहिल्यांदाच भेटलो तेव्हा ती शूटदरम्यान इतरांशी मिसळून वागेल का, याबद्दल मी साशंक होतो. पण, तिने अत्यंत समर्पित वृत्तीने आपली जबाबदारी पार पाडली. ती खूपच मनमिळाऊ असून, लगेचच आमच्या टीमसोबत रूळली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#APJAbdulKalam : डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk

मुंबईतील ‘या’ चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात नाताळ

News Desk

आज ‘ मिर्झा गालिब ‘ यांची २२१ वी जयंती

News Desk
राजकारण

#MeToo : परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी दिला राजीनामा

News Desk

नवी दिल्ली | सोशल मिडीयावर सध्या सुरु असलेल्या #METOO या सोशल चळवळीच्या घे-यात अडकलेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री एमजे अकबर परदेश दौ-यावरु परत आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सरारशी संबंधित असलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार त्यांनी इमेल द्वारे राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. राजीनामा पाठविण्याबरोबरच अकबर यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीची वेळ देखील मागितली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप एमजे अकबर यांच्यावर केला आहे. आरोप झाल्यापासून अकबर वादाच्या भौव-यात अडकले होते. अकबर यांच्या वागण्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर वारंवार आरोप होत होते. त्याच बरोबर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर पत्रकारांनी या संदर्भात अकबर यांनी प्रश्न विचारताच आपण यावर नंतर बोलू असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. अधिकृत परदेश दौ-यावर गेलेल्या केंद्रीय राज्य मंत्र्याने मात्र अद्याप कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेले नाही.

 

Related posts

उद्धव ठाकरेंच्या विमानासमोर नीलगाय, थोडक्यात टळला अनर्थ

News Desk

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील विधानसभेचे तरुण अध्यक्षपदी

Aprna

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

News Desk