HW News Marathi
मनोरंजन

सनी लिओनीचा बायोपिक वादाच्या भौऱ्यात

मुंबई | नुकतंच अभिनेता संजय दत्त याच्यावर संजू या नावाचा बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर सनी लिओनीचा पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सनीच्या आयुष्यावर ही ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलर लोकांच्या पसंतीस उतरला आहे. परंतु, हा बायोपिक आता वादाच्या भौऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

सनी लिओनीच्या आयुष्यावर बनणाऱ्या या बायोपिक शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप नोंदवला आहे. सिनेमात ‘करनजीत कौर’ या शब्दाच्या वापरावर नाराजी व्यक्ती केली आहे. सनी लिओनीने आपला धर्म बदलला आहे. तरीही ती आपल्या सिनेमात ‘कौर’ शब्द वापरत आहे. या शब्दाचा वापर करुन ती शिखांच्या भावनांशी खेळत आहे, असं दिलजीत सिंह बेदी म्हणाले. तसंच याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे सांगण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केतकी माटेगावकर, रोहित राऊत आणि वैशाली माडे यांचे “अहिल्या”साठी पार्श्वगायन

News Desk

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-२९ बद्दल

News Desk

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

News Desk
महाराष्ट्र

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

News Desk

कोल्हापूर | गेल्या सहा दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात पाणी साचले आहे. तर पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर वाढल्याने ६५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि १६ जिल्हामार्गावर पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक वळवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६३ गावांचा संपर्क तुटला असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे

जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने नद्या ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. पावसामुळे यंदा पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १६००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील भाजी मंड्याही बंद झाल्यामुळे नारीकांची गैरसोय झाली.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर ओसंडून वाहत असल्याने हवेत देखील गारठा निर्माण झाला आहे. या पावसाने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होऊन ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे ती गगनबावडामार्गे वळविण्यात आली.

Related posts

“पडळकर हा एक मनोरुग्ण,” शिवसेनेचा पडळकरांवर थेट वार  

News Desk

व्‍यवस्‍थेचे भाग होऊ नका व्‍यवस्‍था बदला : मुख्यमंत्री

News Desk

पंतप्रधानांना हाथरसप्रकरणी दु:ख झाले असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं- नवाब मलिक

News Desk