HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूर | गेल्या सहा दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात पाणी साचले आहे. तर पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर वाढल्याने ६५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि १६ जिल्हामार्गावर पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक वळवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६३ गावांचा संपर्क तुटला असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे

जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने नद्या ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. पावसामुळे यंदा पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १६००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील भाजी मंड्याही बंद झाल्यामुळे नारीकांची गैरसोय झाली.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर ओसंडून वाहत असल्याने हवेत देखील गारठा निर्माण झाला आहे. या पावसाने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होऊन ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे ती गगनबावडामार्गे वळविण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा झाल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट, चौकशी करण्याची मागणी

Aprna

बीडीडी पूनर्विकासाला स्थानिकांचा विरोध

News Desk

मीराबाई चानूनं देशवासियांना समर्पित केलं ऑलिम्पिक पदक….!

News Desk