HW News Marathi
मनोरंजन

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #metoo अंतर्गत अभिनेते नाना पटेकरांवर काहीच दिवसांपूर्वी गैरवर्तनाचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र #metoo ची चर्चा सुरू आहे. नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. राखी सावंत हिने नाना पाटेकरांची बाजू घेत प्रसारमाध्यमांसमोर तनुश्रीला ड्रग ऍडिक्ट असल्याचा खालच्या पातळीचा आरोप केला होता. यामुळेच तनुश्रीने राखी सावंतवर १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. ट्विंकल खन्ना, ऋचा चड्डा, स्वरा भास्कर ,फरहान अख्तर अशा सेलिब्रिटी मंडळींनी तनुश्री दत्ताची बाजू घेतली आहे.

मुलाखतीच्या दरम्यान राखी म्हणाली, “हॉर्न ओके प्लिज या सिनेमाच्या शूट दरम्यान तनुश्रीने अर्ध गाणे चित्रित केले आणि मध्येच सोडले होते. तनुश्रीने ड्रग घेतल्याने ती ते गाणे पूर्ण करू शकली नाही आणि त्यामुळे गणेश आचार्यांनी मला फोन करून बोलावले,” असे राखी सावंत म्हणाली. यावेळी राखी सावंत हिने तनुश्रीसाठी अपशब्द देखील वापरले आहेत. यामुळेच तनुश्रीने राखीवर १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

News Desk

कोमसापच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. महेश केळुसकर

News Desk

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश !

News Desk
देश / विदेश

मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे

Gauri Tilekar

नवी दिल्ली । मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु या याचिकेमागे कोणताही योग्य हेतू नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. १८ वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार आहे, लष्करात भरती होण्याचा अधिकार आहे, तर २१ वर्षापर्यंत लग्नासाठी थांबण्यात काहीच मुद्दा नाही, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती.

ही याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाकडून २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सर न्यायधीश रंजन गोगोई, जस्टीस एस.के.कौल व जस्टीस एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. ५० वर्षे वय असलेल्या याचिकाकर्त्याने लग्नाचे वय १८ करण्याची मागणी करू नये, असे मत कोर्टाने नोंदवले आहे. तसेच १८वर्षाचा मुलगा स्वतःहून येईल, तेव्हा या मागणीचा विचार करू असे ही कोर्टाने सांगितले. वकील अशोक पांडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

Related posts

स्वयंघोषित अध्यात्मिक संत रामपाल दोन्ही हत्याप्रकरणी दोषी

News Desk

कठुआ बलात्कार व हत्या प्रकरणी आज सुनावणी

News Desk

फॉक्सवॅगनमुळे देशाच्या पर्यावरणाचे नुकसान, ठोठावला ५०० कोटींचा दंड

News Desk