HW News Marathi
मनोरंजन

तनुश्री दत्ताला नानांनी बजावली कायदेशीर नोटीस

मुंबई | “मला काल २ कायदेशीर नोटीस मिळाल्या. त्यातली एक नोटीस नाना पाटेकर व दुसरे विवेक अग्निहोत्री यांनी पाठवली. शोषणा विरोधात आवाज उठवण्याची ही किंमत मला मोजावी लागत आहे. अश्या प्रकारे मला माझ्याच देशामध्ये अन्याय सहन करावा लागत आहे.” अश्या प्रकारची माहिती काल तनुश्रीने दिली. पुढे ती असेही म्हणाली,” काल दुपारच्यावेळी माझ्या सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस लंचब्रेकला गेले असताना. दोन अज्ञात व्यक्तींनी माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.”
मनसेनेही मला धमकी दिली. अश्या प्रकारे मला आता कोर्टात खेचले जात आहे. मी खर बोलल्याची किंमत मला मोजावी लागत आहे. अशा प्रकारे मला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा घटनांच्या बाबतीत कोर्टात फक्त तारखा दिल्या जातात . कोर्टामध्ये खोटे साक्षीदार उभे केले जातात.पीडित व्यक्तींना न्याय मिळवण्यासाठी झगडत राहावे लागते. अश्या प्रकारे पीडितांचे खच्चीकरणं होते आणि न्याय मिळण्याची आशा संपते. दहा वर्षाआधी देखील मला अश्याच प्रकारे संघर्ष करावा लागला होता. त्यामळे मी देशाबाहेर निघून गेली. आता परत आल्यानंतर ही मला सहन करावे लागत आहे. त्यामळे माझे नवे आयुष्यही खराब होईल.
तसेच तनुश्रीने नाना पाटेकरांसोबत चॉकलेट सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर देखील गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे. “चॉकलेट-डीप डार्क सिक्रेट” या सिनेमाच्या सेटवर विवेक अग्निहोत्रीयांनी ही गैरवर्तुणूक केल्याचे सांगितले. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने कोणतीही पूर्व कल्पना न देता मला संपूर्ण कपडे काडून डान्स करण्यास सांगितले. पण त्यावेळी सुनील शेट्टी व इरफान खान यांनी मला सांभाळून घेतले.असे ही तनुश्रीने सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटीएफने ऊधळला सलमानच्या हत्येचा कट

News Desk

सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

swarit

नारायण सुर्वेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता, वाचा सविस्तर…

News Desk
राजकारण

#Results2018 : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला संशय !

News Desk

हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या ११९ आहे. त्यामुळे बहुमतासाठी ६० जागा मिळणे आवश्यक आहे. सध्या स्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक ९० जागी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाला १६ पिछेहाट, एआयएमआयएमला ५, भाजपला १ आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत.

तेलंगणा विधानसभेचे निकालांचा कल पाहता निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा संशय काँग्रेस नेता उत्तम कुमार रेड्डी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच रेड्डी पुढे असे देखील म्हणाले की, व्हीव्हीपॅट स्लिपची देखील पुन्हा मोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

Aprna

अखेर राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

News Desk

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पदाचा दुरुपयोग; तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा! – अजित पवार

Aprna