HW News Marathi
राजकारण

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

मुंबई | विधीमंडळातील राजदंडाकडे जर केवळ शोभेची वस्तू म्हणून पाहण्यात येणार असेल तर मग हा मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब करण्याऐवजी कामकाज सुरूच ठेवण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र लिहून त्यांच्याकडे राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळात मोठा गदारोळ झाला. यावेळी मुस्मील आमदाराकडून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. तसेच मुस्लिम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद देखील भिरकावले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले ?

‘जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष विधीमंडळात असतात तेव्हाच हा राजदंड असतो. ते याचे एक प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असते. त्यामुळे हा राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब व्हायला हवी होती. मात्र आज तसे न होता राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचे कामकाज सुरूच राहिले’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल; ‘या’ तारखेला अधिवेशन होण्याची शक्यता

Aprna

“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna

घरपोच दारु पोहोचविण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा !

News Desk