HW News Marathi
मनोरंजन

पंडीत तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला | विनोद तावडे

मुंबई | पद्मश्री पुरस्कार आणि वादय संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेले गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडीत तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, संवादिनी वादन करणारे पंडीत बोरकर यांनी ‘संवादिनी’प्रति असलेली आपली निष्ठा शेवटपर्यंत सोडली नाही. उलट संवादिनीवादनाचे विशेष कार्यक्रम त्यांनी केले.

जिद्द, परिश्रम, आई-वडिलांचा आशीर्वाद आणि नवदुर्गादेवीची कृपा यामुळे त्यांनी संवादिनीवादनात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. अनेक संगीत नाटकांमधून पंडीत बोरकर यांच्या ऑर्गनवादनाची जादू रसिक श्रोत्यांनी अनुभवली आणि ऐकली आहे. पंडीत बोरकर यांनी संगीतसाथ केलेल्या नाटकांच्या प्रयोगांची एकूण संख्या जवळपास दहा हजार इतकी असून यावरुन पंडीत बोरकर यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान दिसून येते. ऑर्गन व संवादिनी वाजविणाऱ्या पंडीत बोरकर यांच्या निधनाने संगीतक्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk

सेक्सचे चार लक्षणे

News Desk

‘पियानो फॉर सेल’चा ग्रँड प्रीमियर सोहळा संपन्न

News Desk
राजकारण

मी सध्या सुखरूप आहे | प्रितम मुंडे

News Desk

बीड |गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि बीडच्या खासदार असलेल्या प्रितम मुंडे यांच्या अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्या बातम्याचे प्रितम मुंडेंनी खंडन केले असून, मी सध्या सुखरूप आहे, असे पत्र देखील त्यांनी आपल्या फेसबुक अंकाऊंटवर शेअर केले आहे.

मुंबई- औरंगाबाद प्रवासादरम्यान शुक्रवारी विमानाला हादरे बसले होते. मात्र मी पुर्णत बरी असून मला कुठलीही दुखापत झालेली नाही, मी सुखरूप असून मतदारसंघात व्यस्त आहे, असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. मुंडे साहेबांची पुण्याई, तुमच्या सगळ्यांची माया आणि प्रेम जोपर्यंत आहे, तो पर्यंत आम्हाला काहीही होऊ शकत नाही, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Related posts

“ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही”, हसन मुश्रीफांनी फेटाळले आरोप

Aprna

औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर तरुणांकडून हल्ला

Gauri Tilekar

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

News Desk