HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले आहे. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुजय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. किडनी निकामी झाल्याने त्यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी फेसबुकद्वारे रीटा भादुरी यांच्या निधनाची माहिती दिली. “मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की, रीता भादुरी आपल्यात राहिल्या नाहीत. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील अंधेरी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील”. असे त्यांनी फेसबुक पोस्ट द्वारे रीटा यांच्या चाहत्यांना सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सैयामी खेरने सिद्धार्थकडून घेतले ग्रामीण भाषेचे धडे

News Desk

सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

swarit

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमामध्ये ‘अमित शहा’च्या भूमिकेत मनोज जोशी

News Desk
मुंबई

दूध आंदोलनाचा मुंबईत परिणाम नाही, दुसऱ्या दिवशीही पुरवठा सुरळीत

News Desk

मुंबई | राज्यभरात सोमवार पासून दूध उत्पादकांना अनुदान देण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभर सर्वच दूध उत्पादक क्षेत्राची कोंडी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि इतर शहरांचा दूध पुरवठा रोखून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हा स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा मुख्य हेतू होता. मात्र स्वाभिमानीच्या आंदोलनाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. अद्याप मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम झालेला नाही. कारण मुंबईचा दूध पुरवठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरू आहे.

पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटल्याचे दिसत आहे. तसेच दूध आंदोलनामुळे आज विधानसभेत देखील गदारोळ होण्याची शक्यता आहे. मुंबईला दुधाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई पोलीस रात्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सपासून प्रत्येक दुकानापर्यंत दुधाच्या गाड्यांना संरक्षण दिले जात होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक दुधाच्या गाडीसोबत एक पोलीस गाडी फिरत होती. मुंबईत येणारे दूध मुंबई बाहेरुन येत असते. त्याच पार्श्वभूमीवर हे संरक्षण दिले गेले.

नाशिक, अमहदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दूधाचा पुरवठा रोखण्यात आला आहे. पुण्यात तर रस्त्यावर दूध फेकून देण्यात आलंय. गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजुने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts

सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांना ‘ऑफिसर ऑफ दी मंथ पुरस्कार’

News Desk

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी सावरकरभक्तांचे उपोषण

News Desk